तू पुन्हा
आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले
मोगर्याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले
पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली
थिरकता तव पावले, सूर साती छेडले
मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्यावरी
थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले
भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा
अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले
गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही
ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले
स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या
हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले
शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या
श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले
काव्यरस
मिसळपाव
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले.