Skip to main content

तू पुन्हा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 27/10/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले मोगर्‍याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली थिरकता तव पावले, सूर साती छेडले मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्‍यावरी थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले
काव्यरस

भागवत यांचे निधन - (बातमी - पुणे सकाळ ८ जून १९६९)

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 27/10/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्मही झाला नव्हता. परंतु, मला ही बातमी मिळाली. ती खाली दिली आहे. यांच्याबद्दल आणखीही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. तरी स्वच्छ नजरेने याकडे पहावे. आपला दृष्टीकोन कळवावा. संदर्भ : रविवार सकाळ, ८ जून १९६९ वर्ष :३० वे (मुखपृष्ठ) बातमी मथळा - शंकर रामचंद्र भागवत वयाचे ८७व्या वर्षी निधन पुणे, ता-७ - पूर्वीच्या पुणे नगरपालिकेचे माजी चीफ ऑफिसर श्री. एस. आर. उर्फ अप्पासाहेब भागवत आज सायंकाळी सात वाजता पेरू गेटाजवळील त्यांच्या राहते घरी वार्धक्यामुळे वयाच्या ८७व्या वर्षी निधन पावले. ...... असा आदर्श अधिकारी झाला नाही कै.

तांदूळगड - तांदूळवाडी

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्‍याला दोरखंडाचे सहाय्य लागेल. काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा. डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता.

स्वर्गाची सहल

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 27/10/2009 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्‍याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो. येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो pavanchakki हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच. इथला भन्नाट वारा आणि रानफुले.

निवडणुका आणि मानोसपचार तज्ज्ञ ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 26/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात.

जुनी पत्रं

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज उघडुन बसले होते सगळी जुनी पत्रे तुझी, माझी, काही जपलेली, न पाठवलेली, काही फाडलेली.... कधी डोळे भरुन येत होते कधी रागाने लाल होत होते.. कधी मी उदास होत होते कधी हरवून जात होते... एक पत्र तुझं मला पाठवलेलं एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर एकटं वाटत असताना तू लिहिलेलं तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर सखी ने पा्ठवलेले खास बंध.... असच एक पत्र हाती आलं खुप खोल दडवून ठेवलेलं.. माझ्या बाबांच...... लग्नानंतर आलेल पहिलं पत्र... खुपसं काळजी करणारं तेवढचं धीर देणारं.. खुप न सांगता खुप काही सांगणारं.... जपुन ठेवलय मी आज ही आज तेच पत्रं म्हणजे माझे बाबा झालेय मला सोडून गेलेले पण
काव्यरस

एक मुका प्रेमसंवाद!

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 26/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी! मिपावरील स्माईलीज माझ्या कायम फेवरिट राहिल्या आहेत. त्यांचाच वापर करून केलाय हा उद्योग! जमलंय का, बघा...

संघटनापालट-३

लेखक अन्वय यांनी सोमवार, 26/10/2009 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेवण घेऊन काका पुतणे दोघेही पुन्हा दिवाणखान्यात येऊन विसावले होते. --- "राज, मला या सगळ्या गोष्टींचा आता तिटकारा आलाय. माझ्या आयुष्यात मी कधीच वजाबाकी केली नाही. माझा जो काही निर्णय असे तो सर्वांच्या हिताचाच असे. माझ्या हिताला मी कधीही प्राधान्य दिलं नाही. पण या उतारवयांतच मला काही कटू आणि मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागलेत. त्यामुळे तुझ्यासारखी माणसे मला दुरावली. मी उभं केलेलं वैभव लयाला जात आहे. हे माझ्या डोळ्यासमोर घडते आहे आणि मी काहीच करू शकत नाही. याचं अतीव दु:ख होतंय. यानंच मी खचून गेलोय. या ढाण्या वाघाचा आवाज आता पार बसलाय. डरकाळी फोडण्याची इच्छा होते; पण ती तोंडातून बाहेर पडत नाही.