Skip to main content

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 22/08/2021 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात.

डिस्टोपिया

लेखक भागो यांनी शनिवार, 21/08/2021 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे “ सी/२०१९क्यू४ ” धुमकेतू वर जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती.

कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 21/08/2021 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
कंदहार.... आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच. नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क. एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय.

पुणे ते लोणावळा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/08/2021 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘दख्खनच्या राणी’ला व्हिस्टा डोम डबा जोडला जाणार अशी बातमी आली. त्या डब्यात बसून बोर घाटामधलं निसर्गसौंदर्य आणखी स्पष्टपणे न्याहाळायला मिळणार या विचाराने ‘दख्खनच्या राणी’च्या चाहत्या प्रवाशांमध्ये आणि तथाकथित रेल्वेप्रेमींमध्ये उत्साह संचारलेला होता. परिणामी भाडं जास्त असूनही पहिल्या दिवशी या डब्याचं आरक्षण पूर्ण झालं होतं. अनेकांचं प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रतीक्षा यादीतच राहिलं. 15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा ‘दख्खनच्या राणी’त उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं.

अभियांत्रिकीचे दिवस-३.. सबमिशन्स

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 20/08/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात, निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसेतरी बॅकलॉग घेऊन, रडत खडत दुसऱ्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढली जायची. ज्याप्रमाणे घरात नवीन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची. "आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत.

वास्तव- चिंतन- तत्वज्ञान मंडनाची कादंबरी (‘मी गोष्टीत मावत नाही’)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 20/08/2021 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. रवींद्र नेवाडकर मी एक सामान्य वाचक आहे. “मी गोष्टीत मावत नाही” या डॉ. सुधीर देवरे यांच्या हटके कादंबरीवर एक वाचक म्हणून प्रतिक्रिया देत आहे. मी देवरे सरांच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया म्हणून काहीतरी लिहीत असतो, हेच माझे साहित्य लिखाण संचित आहे. हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि मला विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र “एक झाड आणि दोन पक्षी” याची आठवण झाली. त्यात लेखकाने आपले जीवनचरित्र लिहितांना एक वेगळाच फॉर्म निवडला आहे. माणसाचे दोन मने असतात. एक जीवनाचा अनुभव घेते तर दुसरे त्याचे विश्लेषण व चिंतन करते. चिंतन करणाऱ्या मनाने अनुभव घेणाऱ्या मनाचे जीवन कथन केलेले आहे.

भारांच्या जगात...५

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 19/08/2021 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं सगळं ठीक होतं भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे. माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.

हंपी एक अनुभव - भाग 3

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 19/08/2021 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
विजयनगर ही राजा कृष्णदेवराय यांची राजधानी होती. सहाजिकच महाराजांच्या इतमामाला शोभेल असाच तामझाम इथे पाहावयास मिळतो. अर्थात हे म्हणत असताना एक सत्य विसरणे शक्यच नाही की माहाराज कृष्णदेवराय अत्यंत सृजनशील राजे होते. त्यांना केवळ उत्तम स्थापत्य निर्माणाची आवड होती असं नसून ते सर्वच क्रीडाप्राकारांचे भोक्ते होते. याची कितीतरी उदाहरणं जागोजागी दिसून येतात. मागील भागामध्ये मी ज्या पुष्कर्णी उल्लेख केला आहे त्या पुष्कर्णीच्या बाजूलाच एक अत्यंत मोठा तरण तलाव निर्माण केला आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेसाठी अत्यंत योग्य असा हा तरण तलाव आहे.