Skip to main content

श्री गणेश लेखमाला २०२१- जीवनसाथी

लेखक आजी यांनी शनिवार, 11/09/2021 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
माझा एक वर्गमित्र.तिसरी ते अकरावी एकाच वर्गात आम्ही शिकलो. त्यानं माझ्यासारखीच सत्तरी पार केलेली. बरेच दिवसात त्याचा फोन नव्हता. मेसेज नव्हता.ग्रुपवर पण मेसेज नाही. मला थोडी काळजी वाटली. मग मीच फोन केला. दोन,तीनदा. वेगवेगळ्या वेळी.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - खुसखुशित पाकातल्या पुर्‍या

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 10/09/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
खुसखुशित पाकातल्या पुर्‍या कृती : एक वाटी मैदा आणि अर्धीवाटी बारीक रवा घ्यावा. दोन्ही छान एकत्र करून त्यात मधोमध गोल करून चिमूट भर मीठ आणि तीन चमचे गरम तुपाचे मोहन घ्यावे. मोहन पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यावे .

काही संभाषणे.

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 10/09/2021 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते. पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?". मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - संत साहित्यातील गणेश

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 10/09/2021 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची आपल्या कडे परंपरा आहे. मग ती पूजा असो, कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असो गायन असो किंवा इतर कोणताही.

देवाक काळजी

लेखक भागो यांनी शुक्रवार, 10/09/2021 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव! माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले. ह्या वयातदेखील बाबा दवाखान्याची पायरी चढले नव्हते. जुने खोड! पण अलीकडे मी बघत होतो, बाबांना थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला होता.

सण आणि आपण

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 09/09/2021 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत.. महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष. हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी. भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.

महाराष्ट्रातील एकमेव रथोत्सव - तासगांव गणपती उत्सव (Tasgaon Rathotsav )

लेखक व्लॉगर पाटील यांनी गुरुवार, 09/09/2021 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपणाला घेऊन जातो आमच्या तासगावच्या प्रसिद्ध गणपती उत्सवाला. आपल्या स्पॉटवर च्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या गावाच्या रथोत्सव तुम्हा सर्वा पर्यंत पोहचवत आहे. सातमजली गोपुरांचे आणि २४२ वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे.

जरा याद करो कुर्बानी

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 09/09/2021 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
जरा याद करो कुर्बानी... शेतात राबणारे हात जेव्हा हातात लाठी घेतात. रानोमाळ भटकणारा आदिवासी जेव्हा संघटित होऊन पेटतो, तेव्हा मोठी आंदोलने उभी राहतात. मग ही आंदोलने स्वातंत्र्यपूर्व काळातील असो कि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची !. ब्रिटिश सरकारला चले जाव असे ठणकावून सांगणारा महाडचा किसान मोर्चा हा त्यातील एक. ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडणारे आणि ब्रिटिश सरकारला मोठा धक्का देणारा हे आंदोलन आजही प्रेरणादायी आहे. काय होते हे आंदोलन कशासाठी होते हे आंदोलन असे प्रश्न नव्या पिढीला सहाजिकच पडणारे आहेत.

संस्कार

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 08/09/2021 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांना संस्कार पालकांचे कर्तव्य पालकांवर संस्कार मुलाचे कर्तव्य !! वय वाढलं म्हणजे अक्कल येतेच असं नाही दर वेळी बचावाला वकिल येतोच असे नाही ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध मुलगा CM भूपेश 'बघेल' बाप नंदकुमार ला जेल!! https://www.lokmat.com/crime/chief-minister-bhupesh-baghels-father-arre… मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना
काव्यरस