धन्य ! धन्य ते मरण ! ! !
आयुष्याच्या वळणावर यम मला भेटला
म्हणाला,
" कधीचंच भेटायचं होतं तुला, जरा उशीरच झाला.”
.” चल आटप लवकर आता, वेळ नाही मला,
सख्खे, सोयरे, जमले सारे, आता उशीर कशाला ? "
मी म्हटलं,
"थांब थोडं
नको घाई
भेट तिची बाकी,
सरणावर वियोगाचे
दुखः नको बाकी."
प्रतीक्षेवीण भेटण्याची, नसे रीत तिची,
वेळेवर आली आज, मला साथ.नशिबाची.