"अगं माधवी, हे काय? तू चक्क आम्रखंड आणलयंस आणि ते ही चितळेंच? तुला माहिती आहे नं काय चाललंय ते?"
"अरे असं काय करतो, माधव? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग काही गोड-धोड नको का जेवणात?"
"ही काय गोड खाऊन सेलिब्रेट करण्यासारखी घटना आहे का?"
"काय???"
"नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की फक्त गोड-धोड खाऊनच आनंद सेलिब्रेट करता येतो का? आपलं एकमेकांवरचं वाढत जाणारं प्रेम काय कमी गोड आहे? त्या तरल, रोमँटीक, गुलाबी भावबंधनाच्या गोडव्यापुढे आम्रखंडाचा गोडवा किती फिका वाटतो हे तुला सांगायची गरज आहे का?"
"अरे हो पण थोडं गोड आणलं बाजारातून तर काय बिघडलं?