Skip to main content

"......आर्जव ....."

लेखक जेनी... यांनी शनिवार, 31/03/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
रागा रागानं घरातून बाहेर पडलेलं त्याच पाऊल मला अस्वस्थ करत होत .

दिवसेंदिवस

लेखक शरद यांनी शनिवार, 31/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस अनुराधा पाटील यांचा पहिला कवितासंग्रह "दिगन्त" १९८१ ला प्रसिद्ध झाला. दुसरा "तरीही" ८५ ला व तिसरा "दिवसेंदिवस" ९१ ला. आजच्या तरुण वाचकांना हे नाव कदाचित माहीतही नसेल पण २५-३० वर्षांपूर्वी समीक्षकांनी, लेखकांनी व कवींनी, हो, कवींनीही, त्यांच्या कवितेचे पोट भरभरून कौतुक केले होते. आज माझ्यासमोर आहे "दिवसेंदिवस". कविता वाचतांना आठवण येते पावसाळ्यात ढग दाटून आलेल्या संध्याकाळातील विषण्णतेची. अशा वेळी तुम्ही एकटे असतांना आठवणी जागृत होतात त्या बहुदा आल्हादकारक नसतातच. आणि त्यात तुमचा स्वभाव अंतर्मुख असेल तर जखमा भळाभळा वाहू लागतात.

(कुठून येते प्रेरणा आणि अशी का विडंबने पडतात)

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 31/03/2012 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मी गेले १५ दिवसा पुण्याबाहेर रहात आहे. पुण्यातल्या नोकरीची शस्त्रक्रिया झाली म्हणून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चेन्नैत येऊन राहिलो. वेळ मिपावर काही काळ येऊन विरंगुळा शोधण्याची होती. मिपावरती कवितांच्या विडंबनांच्या जिलब्या वाचून मन चलबिचल व्हायचे. मिपावर रोज १-२ नवकवी अतृप्त आत्म्याच्या विडंबनाच्या धडकेने/चित्र विचीत्र स्मायल्यांनी खिन्न होत आहेत. कुठे इथे नवकवींना साधी कौतुकाची थापही मिळत नाही. पण इकडे अतृप्त आत्म्याकडे खूप प्रेरणा आहे.

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.
काव्यरस

ही चारोळी कोणाची

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नका रे घालू काशी अशी कवितांची जरी भीकही मिळे तया प्रतिसादांची एकास झाले की ते दुसर्‍यासही होते कपाळावर हात मारुन घ्यावेसे वाटे ही चारोळी आपल्या एका मिपाकराकडून ६ - ७ मिनिटांपूर्वी ऐकली. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे त्या कवीचा पत्ता असेल तर कृपया देवू शकाल का?

कायदेशीर सल्ला हवा आहे !

लेखक धुमकेतू यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका स्नेह्याच्या बाबतीत खालील घटना घडली आहे , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! घटना नीट समजून घेण्यासाठी आपण त्या गृहस्थास "मंगेश" असे नाव देऊ . १) मंगेश हा पुणे मधल्या एका बऱ्यापैकी तंत्रद्यान ( Software ) कंपनी मध्ये साधारण २ वर्षापूर्वी नोकरी करत होता. २) सदरची कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ३) साधारण २ वर्षापूर्वी काही कारणामुळे कंपनी नियमितपणे पगार देऊ शकत नव्हती , व्यवस्थापनाने लवकरच परिस्थिती पूर्वपदाला येईन असी आश्वासने अनेक वेळा दिली .

ही कविता कोणाची

लेखक स्वानंद वागळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
वर कोर्‍या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली वार्‍या खाली कसेबसे उभे रोप जवारीचे एक मलूल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे ... ... ... ... ... ... ... ... उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची तहाला वाडगा घेवून अशी तिष्ठत केंव्हाची ही कविता आपल्या बालभारती च्या पुस्तकात ६ वी -७ वी ला होती. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे पूर्ण कविता असेल तर कृपया देवू शकाल का? धन्यवाद स्वानंद वागळे

म्हणून ......!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 30/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणून ............ सावरायचे होते आता सगळ्यांनाच एकमेकांबरोबर स्वतालाच ............. कुठेतरी बिनसले कि सगळे संपले असे नाही ........ नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत ..म्हणून.............. झाल्या असतील खुळ्या काही चुका सुधारून पाहू ना एकदा.......... नाही जगता येत 'तुझ्याशिवाय' सांगून पाहू एकमेकांना एकदा......... ...म्हणून ................. पाण्यात मिसळलेला रंग जसा वेगळा करता येणार नाही तसाच तुझ्या आठवणीचा पसारा आवरता येणार नाही दोन श्वासातले अंतरही मोजता येणार नाही ..म्हणून........... म्हणून.....