Skip to main content

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 03/05/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना, ही लहान मुले सिनेमात आली की काही प्रश्न हमखास पडतात. १. ती आता कधी हरवणार? (पूर्वी मुले जन्मल्या नंतर लगेच किंवा एक ७/८ वर्षांची झाली की हरवत असत.असे सिनेमे मोठी माणसे पाहत असत.नाही हरवली तर तो लहान मुलांचा सिनेमा असे समजून मोठी माणसे, लहान मुलांना तो सिनेमा बघायला परवानगी देत असत.) २. त्यांना आता कुठला रोग होणार? (ताप येणार, की ब्लड क्यान्सर?) ३. त्यांना आता कुठला अपघात होणार?(बोट बुडणार?की विमान अपघात? की गाडी उडवणार?

एक रस्ता असाही ...

लेखक निश यांनी गुरुवार, 03/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे, भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.

गडांवरील शिल्पे

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 03/05/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
गडांवर भटकंती करत असता बरीच शिल्पे नजरेस पडत असतात. गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात. ह्या शिल्पाकृतींवर गडाचा काळ, त्याचे राज्यकर्ते, गडबांधणीची शैली इ. तपशील कळू शकतो. वास्तविक गडांवरील शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय.

चित्रपटसृष्टीचे जनक कोण्??तोरणे कि फाळके?????????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 03/05/2012 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाच्या आधी वर्षभर प्रदशिर्त झालेल्या ‘पुंडलिक’ या मूकपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा बहुमान मिळावा.

प्रश्न आणि प्रश्न...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 02/05/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया. रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक. जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं. असं काय झालं ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले. भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले. एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही. आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश.

मरण, मृत्यू वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी बुधवार, 02/05/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद.