Skip to main content

तीन हायकू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 01/08/2012 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाऊस धारा पडती हाती गारा ओंजळ रिती २. कुटील कावा मनांत रंगवावा देवळात मी ३. नाच मोराचा हैदोस पावसाचा माझी समाधी

शब्दसावल्या

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 01/08/2012 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,... सैरभैर एकांत माझा,.. झिंगल्या वाटेत सयी सावळ्या- थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या श्वास रुंदावले गोत नादावले पावलो पावली चाहुली पावल्या,.. साचलेले तळे जाहले मोकळे- अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या ...............अज्ञात
काव्यरस

गुबगुबीत कुशन, गुलाबी रंग, आरसा..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील एका लोकल गाडीमध्ये काही सुखावणारे बदल केले आहेत. सदर लोकलमधील दुसर्‍या वर्गातही आता कडक लाकडी बाके जाऊन छान छान मऊ मऊ कुशन असलेली बाकडे बसवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसली तरी दुसर्‍या वर्गातील लोकांनाही पहिल्या वर्गातील लोकांप्रमाणे पार्श्वभाग असतो आणि कुशनवाल्या बाकड्यांमुळे तो सुखावू शकतो, हे रेल्वे व्यवस्थापनाला जाणवले हे फार बरे झाले.. :) त्याचप्रमाणे महिलांच्या डब्यात आता आरसे बसवण्यात आले आहेत.

पथकर (टोल) वसुली मुळातच घटनाबाह्य..!

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पथकराविरोधात आंदोलन केले. आमचे या संदर्भात असे मत आहे की सध्या आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून परस्पर जी पथकरवसुली केली जात आहे ती हे मुळातच घटनाबाह्य आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम २६५ व २६६ मध्ये याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. कलम २६५ प्रमाणे कोणताही कर हा केवळ सरकारलाच वसूल करण्याचा अधिकार आहे. सदर पथकर हा आयआरबी किंवा तत्सम कंपन्यांकडून वसूल होत असल्यामुळे कलम २६५ ची पायमल्ली होत आहे. कलम २६६ प्रमाणे, सदर गोळा झालेला कर हा प्रथमत: 'कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया' ह्या शीर्षकांतर्भूत खात्यातच जमा झाला पाहिजे.

शेतकरी आत्महत्या : संशोधनातील एक अनुभव

लेखक Kavita Mahajan यांनी बुधवार, 01/08/2012 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही विषय लिहायचे राहून जातात. विदर्भात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांबाबत मी एक अभ्यास टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसाठी केला होता. सोबत अंजली पवार ही कार्यकर्ती मैत्रीण होती. ज्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍यांच्या विधवांची सद्य:स्थिती, असा विषय होता. सुमारे ७५ डिप केसस्टडीज केल्या. या अभ्यासात आम्ही विदर्भातले ५ जिल्हे खेडोपाडी विभागून फिरलो. दोघी एकेकट्या फिरत होतो. यात काही अत्यंत विपरित अनुभव वाट्याला आले. आज त्यापैकी एक सांगते आहे. काही भागांत आत्महत्यांचे प्रमाण खूपच जास्त होते. एकेका लहानशा गावात १२ ते १६ आत्महत्या झालेल्या होत्या.

लोकपालचा घटनासंमत प्रवास..

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 01/08/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने आणलेले लोकपाल विधेयक हे संसदेच्या लोकसभेच्या सभागृहात बहुमताने मंजूर झाले. त्यानंतर ते मंजुरीकरता राज्यसभेत गेले. तिथे त्यावर बर्‍याच सुधारणा सुचवण्यात आल्या व ते विधेयक राज्यसभेच्या निवड समितीमध्ये गेले. सदर विधेयकाला संसदेत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांना योग्य वाटतील अशा शिफारशी सुचवण्याचा अधिकार आहे.

चावडीवरच्या गप्पा - साहित्य संमेलने आणि सरकार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 01/08/2012 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली. “ऑ?”, नारुतात्या. “अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता. "अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!", इति नारुतात्या. “अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.

श्यामलादण्डकम् !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी बुधवार, 01/08/2012 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्‍याच वेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले.

मदतीची हाक

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी बुधवार, 01/08/2012 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमटे यांनी आदिवासीं करिता सुरु केलेल्या आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली येथील प्रकल्पावर नविन डेअरी चे शेड तयार झाले आहे.....जवळपास १५ गाई राहू शकतील एवढे मोठे शेड आहे.....आता नविन गाई घ्यायच्या आहेत....आर्थिक मदत हवी आहे....चांगली गाय ४५ ते ५० हजार रुपयाला मिळते....मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा.... aniketamte@gmail.com