Skip to main content

धाव रे धाव देवा आता

लेखक निश यांनी शनिवार, 04/08/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
धाव रे धाव देवा आता गाढ निद्रासुख सोडुन जागा हो आता. तुझ्या न येण्याने इथे पडतो रे खुप फरक मानवानेच केला आहे उभा इथे खरा नरक. खुन, दरोडे, बलात्कार, लाचखोरीने गाठला आहे कळस आता तरी सत्वर ये सोडुन दे रे तुझा आळस. माणसापेक्षा प्राणी बरे, मुके असतील तरी ईमानी असतात खरे. माणसातले श्वापद मात्र माणसावरच धाड अहोरात्र घालतात का रे? करु नकोस उशीर, घे पापविनाशा जन्म पुन्हा, तुझी वाट पाहुन सुकला बघ ह्या धरणी मातेचा रे पान्हा. ये धाऊन सत्वरी करण्या दुष्टांस शिक्षा दे आम्हाला आता तुझ्या उपकारांची जीवन भिक्षा. धाव रे धाव देवा आता.

तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 04/08/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्‍याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं. तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती.

प्रतिभाताईंचा नवा प्रताप !

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 04/08/2012 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सुमार (आणि मुख्यतः वाईट कारणानेच प्रसिद्धी मिळालेल्या) कारकीर्दीकरता प्रसिद्ध असणार्‍या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नवा पराक्रम. राष्ट्रपतीपदावर असताना मिळालेल्या अनेक बहुमोल भेटवस्तू त्यांनी निघताना बरोबर नेल्या आणि त्या आता अमरावतीला आहेत. हे शिष्टाचाराला धरुन नाही असे तज्ञांचे मत आहे. राष्ट्रपती असताना मिळालेल्या भेटवस्तू ह्या राष्ट्रपती भवनात ठेवायचा संकेत आहे. अर्थात तो इथे धाब्यावर बसवला गेला आहे.

नारळी भात (नारळी पोर्णिमेचा खास मेनु)

लेखक Pearl यांनी शनिवार, 04/08/2012 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे इतके छान छान सण आहेत आणि प्रत्येक सणाचा काही खास मेनू अगदी ठरलेला असतो. नुकतीच नारळी पोर्णिमा येऊन गेली. नारळी भात केला होता. एकदम मस्त झाला होता. तशी सोपी आहे रेसिपी. नक्की करून पहा. साहित्यः १ वाटी तांदूळ, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी किसलेले ओले खोबरे, ५-६ काजूचे तुकडे, १५-२० बेदाणे, केशराच्या काड्या (ऑप्शनल), ३ वाट्या पाणी, ५-६ चमचे तूप, ४ लवंगा कृती: १) तांदूळ धुवून ५-१० मिनिटे निथळत ठेवा. एका गॅसवर ३ वाट्या पाणी गरम करत ठेवा. २) एका पॅनमध्ये तूप घेऊन गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात लवंगा घाला. लवंगा चांगल्या तळल्या गेल्या काजू, बेदाणे, केशराच्या चुरलेल्या काड्या घाला.

बायकांचे करिअर !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 04/08/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नास टक्क्याचे आरक्षण हा विषय कधी सुरु झाला हे मला माहिती नाही. कदाचित खुप जुना असेल. पण जोरदार चर्चा व्हायला लागली तेव्हा समजला. पण वैयक्तिक मी माझ्या साठी माझ्या कंपनी मध्ये हा निर्णय खुप आधी म्हणजे हा निर्णय ऐरणीवर येण्या आधी करून टाकला होता. हा निर्णय सामाजिक बांधिलकी मधून वगैरे अजिबात आला नव्हता, हे कबुल करतो. व्यवसायाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षापूर्वी, मुलांबरोबर काही मुली मुलाखतीला आल्या. तुलनेने चांगल्या म्हणजे सबंधित कामासाठी आवश्यक सर्व गुण असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याना संधी मिळाली. काम उत्तम करू लागल्या. आणखी काही मुली कंपनी मध्ये आल्या. मुले ही आली.

हलकल्लोळ - १ (उपोद्घात)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 03/08/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी जयेशने मला 'केऑस्' ह्या नावाचं पुस्तक दिलं. का कुणास ठाऊक, पण अनेक दिवस माझी समजूत अशी होती की केऑस् हा विषय अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सशी निगडीत असावा. जयेशनी थोडीफार कल्पना दिली होती, पण ते पुस्तक उघडण्याची इच्छा अनेक दिवस मला झाली नाही. (पुस्तक मुखपृष्ठ छायाचित्र सौजन्य -  http://www.midshelf.com/ProductSummary.aspx?P=9780749386061 ) अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.

बायोहजार्ड भाग १ /३

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 03/08/2012 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वसूने डाव्या कोपराने स्टेरलियम च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला. मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 03/08/2012 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती.

नो प्रोब्लेम ...

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 03/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक प्रोब्लेम्ला उत्तर हे असताच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा हवा असतो तर कधी मानसं . या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो ....वपुर्झा ..व . पु . काळे यांनी काही वर्षांपूर्वी या ओळी लिहिल्या आणि प्रोब्लेम्स कडे पाहायचा आपला नजरीयाच बदलून गेला. त्या आधीचा माझं जगणं म्हणजे ' बाहर है प्रोब्लेम घरमे है प्रोब्लेम ...आगे पीछे आजू बाजू प्रोब्लेम हि प्रोब्लेम ' असे होते. मला आठवतंय लहानपणी शाळेत असताना गणित हा विषय म्हणजे माझं शत्रू नंबर वन . उदाहरण संग्रह सोडवून तयार ठेवणे हा माझ्या समोरचा मोठा प्रोब्लेम असे.