Skip to main content

राज ठाकरे यांचा विराट मोर्चा व सभा

लेखक तिमा यांनी मंगळवार, 21/08/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरे यांनी आज एक अभूतपूर्व असा प्रकार करुन दाखवला आहे. त्यांचा मोर्चा व त्यानंतर झालेली सभा ही खरोखरच विराट होती. मोर्चाआधीच, त्याबद्दल शंकाकुशंका काढणार्‍या नतद्रष्ट प्रवृत्तींना, त्यांनी जे भाषण केले त्यांत, खणखणीत उत्तर दिले आहे. ११ ऑगस्टला झालेला प्रकार हा सगळ्याच देशप्रेमी माणसांना अस्वस्थ करुन सोडणारा होता. आणि त्यावर शासनाचा नाकर्तेपणा हा तर, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पोलिसही झाल्या प्रकाराने नाराज झाले होतेच. आजच्या या यशस्वी दणकेबाज उत्तरानंतर शासनाची सुस्ती थोडी उतरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. राज ठाकरे यांच्यावर मी अनेकदा टीका केली आहे.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

नकुशा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 21/08/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. त्यामुळे जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तिथे मला पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. अशीच एक पत्रकार मुंबईच्या मध्य रेल्वे मध्ये हल्लीतच भेटली. खरतर संध्याकाळच्या वेळी शांतपणे झोपून किंवा फारतर गाणी ऐकत किंवा पुस्तक चाळत प्रवास कारण मला खूप आवडत. आणि मी तेच करत होते; हातातलं व. पुं. च पुस्तक चाळत स्वस्थ प्रवास करत होते. तितक्यात दादरला चढलेल्या प्रचंड गर्दीतून एक कॅमेरा आता आला, आला कसला पडलाच तो!

'भारतीय' एक पहावा असा चित्रपट

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 21/08/2012 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक शहरातला तरूण खेड्यात जातो. तिथे तो काही बदल घडवू इच्छितो. इथले लोक इतके सुस्त कसे ? आपल्या प्रगतीसाठी ते काहीच हालचाल का करत नाहीत ? असे प्रश्न त्याला पडतात. विजेचा भरोसा नाही , पिण्याच्या पाण्याचेही हालच. गावात एका तरुणीने शाळा स्वरूपाचे काही कार्य चालू केले आहे. सगळी 'स्वदेश' ची आठवण यावी अशी परिस्थिती. यात भर म्हणजे चित्रविचित्र दाढी वाढलेला असंबद्ध वाटावं असं बोलणारा असा एक साधु बैरागीही यामधे आहे. त्यात देशपांडे होता यात मकरंदच पण अनासपुरे आहे. -- अलिकडच्या काळात ग्रामीण मराठी चित्रपट म्हटलं की जे शहरी लोक काम करतात त्यांच्यापैकी एक म्हणजे मोहन आगाशे.

जय हिन्द (१)

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 21/08/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
१. ऑफिसला सकाळी बाहेर पडताच गेटबाहेर काही लोक वाट पहात उभे असलेले लोक कलेक्टरांना दिसले. हे आता सवयीचेच झाले होते. जेंव्हा जाऊ तेंव्हा हा कलेक्टर आपल्याला भेटतोच असा अनुभव आल्यामुळे वेळी अवेळी केंव्हाही लोक भेटत. त्यावर उपाय म्हणून मग कलेक्टर फक्त आपल्याच ऑफिसमध्ये बसण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्ज घेत. म्हणजे मीटिंग्जनाही अडथळा नको, आणि लोकांनाही नाराज करायला नको. अ‍ॅडिशनल डीएमना ते सर्व अर्ज निवेदने गोळा करायला सांगत आणि नंतर स्वतः डोळ्यांखालून घालत.

अवचितगड...

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 20/08/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पर भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो.... केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार.