कर्मविपाक - एक प्रयत्न
सध्या मिपावर पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे वर बराच काथ्याकूट चालू आहे. म्हटल आपण पण एक जिलबी पाडावी. जमलीय का नाही ते सांगायला मोठे आहेतच...
पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे..
उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि|
ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली.
तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली.
आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात :)
असो.
मिसळपाव