Skip to main content

पिंपळ

लेखक पथिक यांनी सोमवार, 01/06/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा! एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

लेखक ganeshpavale यांनी सोमवार, 01/06/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)

कशासाठी आणि जगावे कसे मी विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी जगू पांग फेडावया माय भू चे जगू पांग फेडावया धर्म भू चे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे…

राजांची पालखी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" मी संपूर्ण परिवारासोबत "ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिव

२४ तास---पॅरिस मधे!

लेखक पद्मावति यांनी रविवार, 31/05/2015 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिस--जगातले सर्वात देखणे शहर.... रंगबीरंगी, नखरेल मायनगरी!! जगभरातील कलाकार, कवी, साहित्यिकांचं माहेरघर, आश्रयस्थान. नित्य नवीन फॅशन ट्रेंड्स, असंख्य टॉप ब्रॅंड्स ची गंगोत्री. जगातील सर्वोत्तम संग्रहालये, भव्य दिव्य राजवाडे आणि उद्याने. फ्रेंच परफ्यूम्स, फ्रेंच वाइन, कॅफेस, शॉपिंग आणि नाइटक्लब्स- सारं काही इथे आहे. अशा या नगरीला काही कारणाने धावती भेट देण्याचा योग आला, त्यातही फिरण्यासाठी अगदी एक संध्याकाळ आणि दुसरा दिवस होता. पॅरिस एक-दीड दिवसात बघणं म्हणजे महाभारत चार बुलेट-पॉइण्ट्स मधे समजावून घेण्यासारखं आहे.

उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात – भाग २

लेखक सुधांशुनूलकर यांनी रविवार, 31/05/2015 02:24 या दिवशी प्रकाशित केले.

|| श्री गुरवे नम: ||

उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात – भाग २. भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली पश्चिम घाट म्हणजे जीवविविधतेचा खजिनाच. ‘जागतिक वारसा प्रभाग (World Heritage Site)’ म्हणून जगन्मान्यता लाभलेला प्रदेश. त्यामुळे या भ्रमंतीत उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक जीव पाहायला मिळाले. त्यांच्याबद्दल दुसर्‍या भागात.

लेपाक्षी - एक अदभुत स्थापत्य

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शनिवार, 30/05/2015 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना : धाग्यात फोटो खुप जास्त आहेत, पूर्ण उघडण्यास वेळ लागू शकतो भारतातील सर्वात मोठा नंदी, लटकणारा खांब, मुरल पेंटिंग आणि सुंदर शिल्पकाम इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायची संधि मिळते लेपाक्षीला. लेपाक्षी हे आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यातील एक गाव. बेंगलोरपासून जवळपास १५० किमी अंतरावर. ह्या गावात विजयनगर काळातील विरभद्राचे मंदिर आहे. लेपाक्षीचे पौराणिक महत्व असे सांगितले जाते की, रावण ज्यावेळी सीतेचे हरन करून नेत होता तेंव्हा जटायूने त्याच्याशी युद्ध केले. रावणाने जटायुचे दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायु जमिनीवर कोसळला. आणि ती जागा लेपाक्षी.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/05/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल पूर्वीचे आज महानगर झाले पहिल्या पेक्षा जास्त खतरनाक झाले. भरल्या पोटी वाघ करत नव्हता शिकार. बेधुंध कार आज कधीही घेते प्राण. तेंव्हा दरवळत होता सुगंध मलयज गिरीचा. पेट्रोलच्या वासाने आज कासावीस होतो प्राण. कांव कांव कावळ्यांचे घरटे उंच मीनारांवर अंगणातली चिवताई कुठे हरवली आज.
काव्यरस

तनू वेड्स मनू रिटर्न

लेखक पुणेकर भामटा यांनी शनिवार, 30/05/2015 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे.