तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची
आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपले कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो....
एके काळी इक्वाषु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते.
गादी
सर्व मिपाकरांना सादर प्रणाम करून पहिलेवहिले लेखन सादर करत आहे. शुद्धलेखन व टायपिंग मिस्टेक्स समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे.
माझी भांडाभांडी
काही दिवसापूर्वी घर शिफ्ट केलं. नवीन घरातलं स्वैपाकघर आधीच्या घरापेक्षा लहान आहे. सामान लावताना एक महत्वपूर्ण साक्षात्कार झाला, की माझ्या घरातील एकूण पसाऱ्याचा सुमारे चार दशांश व्हॉल्यूम विविध आकाराच्या, प्रकारच्या आणि उपयोगाच्या भांड्यांनी व्यापला आहे. बाबौ ! इतक्या वर्षांच्या प्रपंचात मी भांडाभांडी फारशी केली नसली तरी भांडी भरपूर जमवलीत हे प्रखर सत्य त्या घराबाहेर पडलेल्या भांड्यांनी मला जाणवून दिले.
नवीन घरात गेल्यावर सामान लावणे हा एक हॉरिबल प्रकार असतो.
कोकणात रबर लागवड - भाग २ (जमीन खरेदी)
पहिला भाग
कोकणात रबर लागवडीचा विचार आहे
----
पहिला भाग हा नोव्हेंबर २०१४ मध्ये, बहुधा काथ्याकूट सदरात टाकला होता.
दुसरा भाग टाकायला बराच विलंब होत आहे. कारण आमचा उपक्रमही वेळखाऊ आहे. योजलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काहीही होत नाहीये आणि खोडे घालणारे लोक/घटक विपुल आहेत. असो.
मागील भागात सांगितल्याप्रमाणे आमचा बेत, मार्च २०१५ मध्ये एकूण २० एकर जमीन खरेदी करायची, मे महिन्यापर्यंत जमिनीत माजलेल्या जंगलाची सफाई करून घ्यायची आणि जून २०१५ मधे पहिला पाऊस होताच रबर लागवड करून टाकायची असा होता.
भात
भात
हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " .
'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला
भात
... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु !हिरवाई..!
पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले
हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले!
रंगाकाव्यरस
पुन्हा पाऊस
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया
गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया
भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली
स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली
का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा
कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा
किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत
तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत
बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण
कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
भटकंती ८ १/२ - तदाओ आन्दो
भटकंती - ८.५
तदाओ आन्दो.
तदाओ आन्दो नावाच गारुड एखाद्या लेखात मावणारं नाहीच. म्हणून हा साडे आठवा लेख.
अवचित सापडलेला एखादा सिनेमा भावतो आणि त्या दिग्दर्शकाच झाडून सगळ शोधुन पाहाव लागत ना , तसच झाल ह्या आन्दो सान च. 'चर्च ऑफ लाईट ' चे फोटो अन लहानसा लेख सापडला अन शोधयात्रा सुरु झाली. विद्यार्थीदशेत जे सापडल ते अनुभवांती उमजायला लागल. आणि नंतर त्या इमारती प्रत्यक्ष पहाण्याचीही संधी मिळाली.
मला स्वतःला अस वाटत की प्रत्येकाची ; आजूबाजू, घटना, परिस्थिती ला रिअॅक्ट करण्याची पद्धत वेगळी असते.
मिसळपाव