कोकणची 'तोंड'ओळख
तुझं गाव कुठलं? असा लहानपणी दुसऱ्या इयत्तेत असताना बाईंनी प्रश्न विचारला. मी म्हटलं नागाव. घरी येउन आईला सांगितलं तेव्हा ती हसून म्हणाली, 'अगं ते माझं आजोळ आहे. आपलं गाव आंजर्ले. दापोली मधे. यापुढे कुणी विचारलं तर लक्षात ठेव. आपण जाऊ या मे महिन्याच्या सुट्टीत.' खरं सांगायचं तर तेव्हा आपलं गाव (हो ’आपला’ गाव ही रचना सर्रास वापरतात पण ते ’आपलं’ गाव असतं) कोकणात आहे यापेक्षा अधिक माहिती नव्हती पण कोकण खूप खास आहे हे मात्र जाणवलं होतं. पुढे जेव्हा अनेकदा कोकणात जायची वेळ आली तेव्हा प्रत्येक वेळी त्याची खासियत उलगडत गेली.
मिसळपाव
संदर्भ - श्री एकनाथी भागवत
फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर
अन्नपूर्णा देवी चित्र - मितान
श्लोक - निनाद काटदरे
मुखपृष्ठ - श्री.नागेश कदम
फोटो - सानिकास्वप्निल