Skip to main content

आहारतज्ञाशी गाठ

लेखक अजया यांनी गुरुवार, 15/10/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यासाठी अन्न महत्वाचे आहे. आपल्या आहारात योग्य ती पोषकतत्वे असली तर शरीर निरोगी राहतं, शरीराची वाढ, विकास, शक्ती ह्यावर नियंत्रण ठेवता येतं. मानसिक आरोग्य संतुलित राहतं. आपण आपली जीवनशैली सुधारून, योग्य आहार घेऊन, व्यायाम करुन आरोग्यपूर्ण ठेवले तर आपले स्वास्थ्य निरोगी व शरीर सुदृढ बनेल. आणि यासाठीच रुची विशेषांक करायला सुरूवात करतानाच आहाराची योग्य माहिती आपण आहारतज्ञाकडूनच मिळवू असं ठरवलं होतं आणि तृप्ती ताम्हाणे या आहारतज्ञ मैत्रिणीची ओळखीतून गाठ पडली. तिनेही दिलखुलासपणे आम्हाला मुलाखत देण्याचे मान्य केले. या मुलाखतीदरम्यान आहाराचे अनेक पैलू नव्याने उमजले. अनेक गैरसमजांवर प्रकाश पडला.

दि केक आर्टिस्ट

लेखक उमा @ मिपा यांनी गुरुवार, 15/10/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवसाय उभा करायचा म्हणजे भरपूर भांडवल, विशेष प्रशिक्षण, वेगळे मनुष्यबळ या गोष्टी हव्यात ही समजूत बाजूला सारत अंगभूत कलागुणांचा उपयोग करून घेत, इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर यशस्वी घरगुती व्यवसाय उभारला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे, वृषाली विनोद. ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्सचे केक बनवून देण्याचं काम वृषाली करते. हा तिने स्वतः सुरु केलेला घरगुती व्यवसाय आहे.

( बाराची बिअर )

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 15/10/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमुची प्रेर्ना ऑक्टोबरमासी जो कोणी होरपळतो एव्हरी इअर ..... बैठकीत दोस्तांबरोबर होऊन-देतो तो एक बिअर बाराची बिअर थंडगार असते, बाटलीच्या बुचाला उचाकावलं कि आपला हात मस्तसा भिजवते, चखणा हवा काय म्हणून मिश्कीलपणे विचारते ! बाराची बिअर सोनेरी सुंदरी असते गळ्याखाली उतरताना, पोळलेल्या शरीराचा, रोम न् रोम थंडावते जिभेवर माल्टचा स्वाद पसरवते, लिंबाची फोड हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारते! बाराची बिअर कॅालेजची आठवण असते ! मनाचा एकदम रिट्रोस्कोप करते पण हातातला ग्लास हातातच ठेवते ............

आई मला भूक लागली!

लेखक नूतन सावंत यांनी गुरुवार, 15/10/2015 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला भूक लागली! घरातले बाळराजे मोठे व्हायला लागले की त्याच्या आईची फार धांदल उडायला लागते. बाळाच्या वेगवेगळ्या वयातल्या भूकेला त्याला काय सुयोग्य आहार द्यावा या विचाराने भांबावलेल्या एका अनाहितेने, पिलीयन रायडरने, हा धागा अनाहितावर सुरू केला होता. यात बर्‍याच जणींनी भर टाकली आणि अंकाच्या निमित्ताने हा धागा सर्वांसाठी खूला करत आहोत. (माहिती संकलन-सुरन्गी) बाळाच्या आहाराची सुरुवात करायची मऊ भात आणि साय, किंवा मऊ भात घट्ट गोडं वरण, किंवा मऊ भात मेतकूट, साजूक तुपाने.

माझ्या तान्हुल्यासाठी

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 15/10/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेहून वहिनी आली होती म्हणून तिला भेटायला अन कुटुंबात नव्याने चैतन्य आणणार्‍या भाचीला पाहायला म्हणून आत्याकडे गेले होते. गावं अर्थात कोल्हापूर! आत्या सुशिक्षित! त्यांच्या दोन मुली डॉक्टर, मुलगा इंजीनिअर!! इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन त्यातली एक आतेबहीण सांगू लागली, (हिला स्वतःला त्या वेळी दोन मुले, मी ही माझा लहान मुलगा घेऊन सिंगापूरहून आलेली) "अगं पाहिलंस का?

'मिस्टरी' वाला 'गम्मत बॉक्स'!!!

लेखक गिरकी यांनी गुरुवार, 15/10/2015 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
मुळातच आम्ही (मी आणि यजमान) खादाड म्हणून जन्माला आलेले. 'प्रेम म्हणजे एकत्र खाऊन एकत्र लठ्ठ होणे' हे आमचे सह-जीवन आणि सह-जेवण सूत्र! त्यामुळे एकत्र हिंडण्या फिरण्यासोबतच एकत्र स्वयंपाक हेसुद्धा आलेच. तर असे आमचे जेवण-जीवन सुखेनैव नांदत होते. अशातच मध्यंतरी मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया वरून प्रेरणा घेऊन आपले अस्सल देशी मास्टरशेफ इंडिया सुरु झाले आणि आम्हा दोघांनाही स्वत: मास्टरशेफ बनण्याची स्वप्ने पडू लागली. दोघांनाही एकत्र स्वयंपाक करण्या ऐवजी एकमेकांशी स्वयंपाकघरात दोन हात करायची सुरसुरी आली. मग प्लान झाला की देशी जाऊदे निदान 'मास्टरशेफ - होम' स्पर्धा तरी होऊनच जाऊदे!!

वैदर्भीय खाद्यसंस्कृती

लेखक मधुरा देशपांडे यांनी गुरुवार, 15/10/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, काय म्हणताय? बरे आहात ना समदे? ठीक हाव ना? तर मी आता तुम्हास्नी जरा विदर्भाच्या खाण्यापिण्या बद्दल, तिथल्या लोकांच्या आवडी निवडी, सवयी याची जरा माहिती देतेय या लेखातून. त्याचं आसं झालं, की आम्ही अनाहितानी रुची विशेषांक काढायचे ठरिवले. मंग आता तेच्यात विदर्भाचा लेख पायजे म्हंजे पायजेच. विदर्भातले लोकांनी कावून मागे राहायचे? न्हायतर उपोषण हायेच ठरलेले मालकांकडे. पन तशी वेळ काही आमच्या अनाहितात कधी येत न्हाय. समद्यांनी मिळून ठरिवले की समस्त अनाहिता महिला मंडळाकडून विदर्भाची प्रतिनिधी म्हनून मी लेख लिहिणार.

अन्नपूर्णेचा वारसा

लेखक मितान यांनी गुरुवार, 15/10/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी आपल्या जिभेची लहानपणची स्मृती वर येते नि मग तेच लहानपणचे पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. लेकीसाठी रोज काही नवं करतानाही आपण लहानपणी खाल्लेले पदार्थ आधी आठवतात. आजीचे, पणजीचे हे पदार्थ, त्यांच्या पाककृती नव्या ग्लोबल चवींच्या मार्‍यापुढे हरवून जातील अशी भिती वाटते. मागच्या पिढीनं हस्तांतरित केलेला हा अन्नपूर्णेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खरं तर अलिखित कर्तव्यच. तो वारसा पुढे चालवायचा की नाही हे पुढच्या पिढीने ठरवावं. म्हणून ठरवलं की असे काही पदार्थ लिहून ठेवुया. परवा उकडशेंगोळे करताना गडगिळ्यांची आठवण झाली.

कोकम माहिती

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 15/10/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्‍या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्‍या झाडांवरच अवलंबून होता.

अनवट पदार्थ

लेखक अस्मी यांनी गुरुवार, 15/10/2015 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे हिरवेगार डोंगर, नारळाची बाग, पोफळी-केळींची आगरं, आंबे, मासे आणि अथांग समुद्र!!! कोकण ही अपरांताची भूमी आहे. ह्या भूमीमध्यॆ अनेक आश्चर्य दडलेली आहेत. मंत्रविद्या, तंत्रविद्या, शिल्पकला, चित्रकला, अस्त्रं, शस्त्रं, भूमीविज्ञान याचबरोबर कोकणातील खाद्यसंस्कृतीही अपूर्व आणि काहीशी गूढ आहे. पूर्वीच्या पाकशास्त्रनिपुण आणि आहारतज्ञ योग्यतेच्या स्त्रियांनी त्या त्या ऋतुमानाप्रमाणे विविध निसर्गदत्त भाज्यांचे नियोजन करून जतन केले आहे.