आहारतज्ञाशी गाठ
जगण्यासाठी अन्न महत्वाचे आहे. आपल्या आहारात योग्य ती पोषकतत्वे असली तर शरीर निरोगी राहतं, शरीराची वाढ, विकास, शक्ती ह्यावर नियंत्रण ठेवता येतं. मानसिक आरोग्य संतुलित राहतं. आपण आपली जीवनशैली सुधारून, योग्य आहार घेऊन, व्यायाम करुन आरोग्यपूर्ण ठेवले तर आपले स्वास्थ्य निरोगी व शरीर सुदृढ बनेल. आणि यासाठीच रुची विशेषांक करायला सुरूवात करतानाच आहाराची योग्य माहिती आपण आहारतज्ञाकडूनच मिळवू असं ठरवलं होतं आणि तृप्ती ताम्हाणे या आहारतज्ञ मैत्रिणीची ओळखीतून गाठ पडली. तिनेही दिलखुलासपणे आम्हाला मुलाखत देण्याचे मान्य केले. या मुलाखतीदरम्यान आहाराचे अनेक पैलू नव्याने उमजले. अनेक गैरसमजांवर प्रकाश पडला.
मिसळपाव