Skip to main content

जमतारा पॅटर्न

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 14/01/2021 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी नुकताच आलेला अनुभव तुम्हाला सावध करण्यासाठी मांडत आहे. घराची आवरा आवरी करताना बर्‍याच वस्तु माळ्यावरुन निघाल्या, त्यातली एक वस्तू मी ओ एल एक्स वर विकायला टाकली होती. सहसा ओ एल एक्स वर जाहिरात टाकली की लोक चॅटवर चौकशी करु लागतात. बहुतेक वेळा स्थानिक लोकच असतात.बहुतेक जण जास्त फोटो वगैरे मागतात किवा किमतीत घासाघीस करतात. मग फोन नंबर मागतात आणि बोलणे होउन वेळ ठरवुन कधीतरी वस्तु घेउन जातात. पेमेंट सहसा कॅश किवा गूगल पे वर होते. आता या केसमध्ये मला लगेच फोन येउ लागले सगळे लोक हिंदी बोलणारे होते. पहिला फोन आला.

मिपा बालमित्रः धम्मालपंती.. २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/01/2021 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-color: #008080; /* For browsers that do not support gradients */ } .w3-content { max-width:800px;background-color: #fff; } .h1 {font-family: 'Teko', sans-serif;} .majkur {text-align:justify;font-family: 'Noto Sans', sans-serif;} .col-sm-9 {padding-bottom:16px;backgr

AI आणि मी

लेखक चिनार यांनी गुरुवार, 14/01/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक आपल्यावर लक्ष ठेवतंय, व्हॉट्स ऍप आता आपला डेटा स्टोअर करणार, मग आपल्या इंटरेस्टनुसार आपल्यावर जाहिरातींचा भडिमार होणार... हे सगळं ठीक आहे. पण, एखाद्या वेबसाईटवरून एखादा शर्ट घेतल्यावर परत परत तोच शर्ट समोर दिसावा ही आर्टीफिशियल इंटिलीजन्सची कोणती पातळी म्हणावी? कोण बसलंय तिथं प्रोजेक्टरच्या मागे? अरे वांग्या, बायकोसाठी एखादी साडी किंवा कुर्ता घेतल्यावर महिन्याभराने परत तीच साडी किंवा कुर्ता घेतला तर त्याचे परिणाम कळतात का तूला? त्या झुक्याला म्हणा, स्वतः च्या बायकोसोबत असं करून दाखव एकदा! मला सांगतोय..! पुरुष मूर्ख असतात पण इतके नाहीत रे. काहीतरी व्हेरायटी दाखव लेका!

आज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाराम भागवत शास्त्री शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले. तीन वर्षे मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्यांजवळ पांच-सहा वर्षे संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवू लागले.

आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 14/01/2021 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले. दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरून फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होते. त्या सरोवरांत मायेने पाण्याचे स्तंभन करून दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला.

तिळाचे लाडू

लेखक सरिता बांदेकर यांनी बुधवार, 13/01/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिळाचे लाडू सौ सरिता सुभाष बांदेकर ही तिळाच्या लाडवाची पाककृती नाहीय, पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का??? याचा फोटो काढावा असे त्यावेळी वाटलं नाही कारण त्यावेळी सेल्फीची हवा नव्हती.म्हणजे मोबाईलच्या जन्मा आधीची ही खरीखुरी घडलेली गोष्ट आहे.

जलाशय

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 12/01/2021 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आलो परतुनी आणखी जाहलो जुना जरी अजून माझा जीव तरंगे पाचूच्या पाण्यावरी गारवा असा त्याचा की भिडतो आत्म्यास थेट वितळते जग अवघे मीच एक तरंगते बेट तिरप्या कोनातूनी येई सुवर्ण प्रकाश शलाका स्पर्षता पाण्यास गारठे कवडसे जणू मूक हाका बाजूस एका आत्ममग्न संतत स्फटीकधार सांडते घुमते गव्हारात उन्हाच्या संगीत हाकांस लाभते का अजून मी अडकलो तिथेच मनाने ना कळे बहुदा आठवती शांत ते तुझे जलाशयासम डोळे -अनुप

मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि ! शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 12/01/2021 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... joga paramanand तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत.

सरपण

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 11/01/2021 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
सरपण लहानपणी गावी वीज नव्हती.गॅस नव्हता.स्टोव्ह नव्हते. स्वयंपाक ,पाणी तापवणे चुलीवरअसे.त्या दिवसांची आठवण आली अन सरपण आठवले. लिहायला इंधन मिळाले.सरपण नसले तर घरची चूल पेटणे शक्य नसे.मजूरीसाठी जाणार्या बाया बापड्या संध्याकाळी कामावरून परतताना वाटेत मिळेल त्या लाकूडफाट्याचा भारा डोक्यावर आणत.अजूनही आणतात.सुस्थितीतील घरच्या स्त्रियांना सरपण जमा करण्याचे कष्ट नसत. पुरूषांना त्याची काळजी.सरपणा साठी ,इमारतीसाठी,शेतीचीअवजारे,औत,कोळपे ,बैलगाड्या तयार करणे इ.साठी,लाकूड हवेच.मग शेतातल्या जुन्या,वहितीला अडचण असणारे झाडांची कटाई होई.झाडे जास्त व मोठी असली तर तोडायचा गुत्ता/ ठेका दिला जाई.