Skip to main content

प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं? दिपक पासे

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 08/07/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरिस्तात जाऊन Coffie प्यायची की CCD तला थंड चहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? कधी Mc'd चा बर्गर खा नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? तिला घेऊन खडकवासला की कार काढून लोणावळा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? दररोज फोन calls आणि SMS करावे लागतील तिला? प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? प्रेम हा विषयच आमचा कच्चा ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? अहो, ह्या कसल्या प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा प्रे

चाहूल

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 08/07/2008 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हसू आरशात आज आहे चांदण्याची, बरसात आज आहे | मिटले कसे कमलदल अलगद बंदिवान त्यात, भ्रमर आज आहे | घुमती आसमंती नाद पैंजणांचे सूर-लयीत हरवले, जग आज आहे | उमटती हळूवार तरंग जळावरी विश्व हे रजनीच्या, अधीन आज आहे | सळसळती पाने, रान सारे जागे सर्वांगी भिनलेला, गंध आज आहे | नयनी उमटे लाली, मन धुंदावलेले स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |

पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर.

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 08/07/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट! किती ग वाट बघायची त्यासाठी? किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता...) त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्याट्यावर आण्लं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अम्रुत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं.

रोठ

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 08/07/2008 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
:SS साहित्य--एक वाटी बारीक रवा,बारीक चिरलेला कांदा,मिरची व कोथिंबीर,एक वाटी आंबट ताक,मीठ,पाव टी स्पून खायचा सोडा(पूड),एक चमचा तेल,निर्लेपचे भांडे कॄती---रवा घेऊन त्यात ताक व थोडे पाणी घालून फेटावे, नंतर कांदा,मिरची व कोथिंबीर घालावी.अर्धा तास मिश्रण तसेच ठेवावे.भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून घ्यावें. नंतर मिश्रणात सोडा घालून ते एकवार फेटून लगेच भांड्यात ओतावे.ओव्हनमध्ये किंवा गॅसवर १० ते १५ मि.ठेवावे.मिश्रण फुगून येइल.ताटात ते घेऊन वड्या पाडाव्यात.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावे. झटपट नाश्ता तयार!

मरण मला पाहून हंसले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/07/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून मी पाहिले माझेच मरण मला पाहून हंसले हंसण्याचे काय कारण पुसता म्हणाले ते आलीच वेळ नेण्याची, न विसरता असते मी सदैव सर्वांच्या मागे सावली होऊन पहाते कोण कसा वागे झडप घालते पाहून तो गाफील जो न समजे जीवन असे मुष्कील खातो मी सदैव हेल्थी फूड ठेवीतो माझे मी आनंदी मूड घेतो मी नियमीत व्यायाम का मी नये राहू इथे कायम जनन मरण असे निसर्गाचा नियम घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त मरणे हे तरी असे उद्याचे सत्य श्रीकृष्ण सामंत

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 08/07/2008 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/07/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो. बाबारे, कुणी तरी म्हटला हा, "सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां." तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा. माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा.

विवाहाची पद्यातली आमंत्रण पत्रिका

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 07/07/2008 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्याच्या उंबरठ्यावर सुनीत-स्मिताचं स्वप्न एकमेकांच्या सुखदु:खात व्हायचंय त्यांना मग्न ! त्यांच्या अशा प्रेमांकुराची वाढ व्हावी निर्विघ्न , म्हणून योजलंय आम्ही चौघांनी आज त्यांचं लग्न ! दिवस आहे १९ ऑक्टोबर रविवार आहे सुट्टीचा मुहुर्त आहे गोरज वेळ संध्याकाळी सहा चा ! त्यांना द्यायला आशिर्वाद वेळेवर यायची घ्या दक्षता