Skip to main content

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता.. त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता. आता आपला ग्रुप फुटला आहे, कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर It is my Mess and i Love it पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले, बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड, मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें" तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वे

मोबाईल निरक्षरांच्या दुनियेत!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 04/01/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी. मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही.

रुई माछ भापे - (वाफवलेला रोहु मासा)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 04/01/2009 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

साहित्यः * कोणत्याहि मोठ्या माशाचे ६-८ तुकडे (रोहु, कतला, सुरमई...मी रोहु आणि हलवा वापरला आहे) * ४ मोठे चमचे पिवळी मोहरी * ८-१० हिरव्या मिरच्या * ४ मोठे चमचे मोहरीचे तेल * मीठ * केळिची पाने

रवा इडली

लेखक रेवती यांनी शनिवार, 03/01/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा. एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला. कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो. चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या. साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते.

राजे – १

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 03/01/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र. बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 03/01/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
Bheemasen पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते.

कमाल आहे!

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 03/01/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
(मित्रहो, ही खरेतर स्मृतीतील एक कथा. केव्हा कुठे वाचली, ते लक्षातही नाही. पण कथा मात्र विसरली नाही. अशा कथा खरेतर तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाचनात येतात. कोणाला हिचा खरा आणि मूळ लेखक आणि मूळ कथा माहीत असेल, तर जरूर सांगावे! कारण हा कथाविषय माझा नाही. जमले आणि लोकाना आवडले, तर अशा कितीतरी स्मृतीआडच्या कथा मिपावर लिहाव्यात असा मानस आहे) तात्याबा भर दुपारी शेतावर काम करत होते. नेहमीचीच संवय त्यांची. दुपारची शिदोरी आटपून विश्रांती वगैरे भानगडीत न पडता कामाला लागावे हाच नेम. विठाबाई कातावून म्हणे, "अहो वयाकडे लक्ष द्यावं जरा.

जुना ओसाड वाडा

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 03/01/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्याच्या आठवणीची कविता तुटलेल्या दिंडीमधुनी अवचित आत मी येते चाफ्याच्या सोनफुलांचे आठवून सुगंधी नाते भिंत जरी खचलेली ती गवत पांघरुन बोले लखलखत्या आठवणींचे अवशेष मोहरून आले आठवे देवघर इथले श्रध्देच्या सांज सकाळी फिरतात आता बेताल मुंग्यांच्या काळ्या ओळी अल्लड अंगणामधला प्राजक्त फुलांचा भार शिडकाव्यामधुनी ठेवे अंगणावर अधिकार आटला अभागी आड डोळ्यात साचले पाणी ह्या लगबग काठावरती मी कितीक गाईली गाणी परतूनी निघाले जेव्हा तोडून भरजरी धागे दिंडीच्या दरवाज्यातून हे कोण खेचते मागे ?

अण्णांना मानवंदना..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 03/01/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना मानवंदना..! इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे.. राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे.. आपला, (भीमसेनभक्त) तात्या.