हिरोशिमाचा स्मृतिदिवस
जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली.
स्मरण चांदणे२
स्मरण चांदणे२
दिवस कलत असताना,आता लवकरच सुर्यास्त होणार याची जाणीव होऊ लागते,तो होऊ नये अशी काहींची ईच्छा असते. ते तर शक्य नसते.ते सकाळच्या आठवणीत रमतात.दिवस संपण्याच्या वास्तवाचे विस्मरण होते काही क्षण!
बालपणाचे गोडवे अनेकांनी गायले आहेत. लहानपणी काही कळत नसते,म्हणून आपण सुखात असतो,निर्धास्तअसतो.आईवडिलांच्या
,मोठ्यांच्या छायेत सुरक्षित असतो.जीवनाच्या वास्तवापासून दूर,अज्ञानातला आनंद उपभोगत!
वय जसजसे वाढत जाते तस तशा जबाबदा-या वाढत जातात.
‘लॉटरी'.......अरे बाप रे (कथा परिचय: ७)
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:
१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
६. ती सुंदर? मीही सुंदर !
..................................................................................................
आतापर्यंत वाचकांच्या मनमोकळ्या व उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे या लेखमालेचे ६ भाग सादर केले.
चेहरे मुखवट्याआडचे
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते.
कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)
23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत.
हंपी एक अनुभव - भाग १
गेले अनेक दिवस... दिवस का गेलं वर्षभर हंपीला जावं असं मनात होतं. पण 2020 आलं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि भविष्यातली स्वप्न बदलून गेलं. दिवाळीपर्यंत पुढचा काही... विशेषतः आपल्या स्वप्नांचा काही विचार करण्याची हिंमत देखील नव्हती. पण मग हळूहळू आयुष्य काहीसं पूर्व पदावर येतं आहे असं वाटायला लागलं आणि मग पूर्वी बघितलेली स्वप्न परत डोकं वर काढायला लागली.... मला पुन्हा एकदा हंपीची स्वप्न पडायला लागली. अर्थात इतक्या लांब स्वतः ड्राईव्ह करून जायचं म्हंटल्यावर नीट विचार करून योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वच्छता राखणे (Sanitization) हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता.
ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः।
पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य
(ऋ. १०/१८९/१)
अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.
ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.
गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते.
मी आणि कानयंत्र..
अखेर मी म्हातारी झाले. वय चोरुन बघितलं पण शरीर ऐकेना. अनेक वस्तू मला ॲक्सेसरीज् म्हणून गरजेच्या वाटू लागल्या. मला ऐकू येईनासं झालं. घरातला टीव्ही मी खूप मोठ्या आवाजात लावून बसू लागले. त्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ लागला. गेले दीड वर्ष मुलाचं वर्क फ्रॉम होम होतं आणि नातवाची ऑनलाईन शाळा होती. मी आणि सूनबाई तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसायचो. टीव्ही वरील कोरोनाच्या आणि हे सरकार कोसळणार की पाच वर्षे टिकणार, याबद्दलच्या बातम्या कितीदा ऐकायच्या? मग मी टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम बघायची. मला ऐकू येत नाही म्हणून आवाज मोठा करायची. संवादच ऐकू आले नाहीत तर सिरीयल ची मजा ती काय हो?
मिसळपाव