Skip to main content

रस्ते

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 10/12/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 09/12/2021 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 09/12/2021 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती. घटना परिषदेच्या सिद्धांतांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. त्यामुळे तिच्या स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींही पाहणे आवश्यक ठरते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 17व्या शतकाच्या प्रारंभी भारतात आगमन झाल्यापासूनच भारताचा घटनात्मक विकास सुरू झाला.

भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता

लेखक हर्षल वैद्य यांनी बुधवार, 08/12/2021 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही.

[लघुलेख] सोबत

लेखक तर्कवादी यांनी मंगळवार, 07/12/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो. असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ).

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/12/2021 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती २७ ऑक्टोबर! रात्री खूप लवकर झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. भयंकर थंडी आहे! पण पहाटेचं वातावरण आणि पहाटेचं आकाशही बघण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कुडकुडत बाहेर आलो! आकाशामध्ये जबरदस्त नजारे आहेत. अष्टमीचा चंद्र डोक्यावर असल्यामुळे तारे काहीसे कमी दिसत आहेत. काही वेळ दुर्बिणीतून आकाश दर्शन केलं.

बोंबललेल्या सुहागरातीची कहाणी (संपूर्ण)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/12/2021 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
सृष्टीची रचना झाल्यापासून शेकडो वर्ष पृथ्वीतलावर राहिलेल्यांचा असा दृढ विश्वास आहे की इच्छाधारी साप कोणत्याही क्षणी कोणाचंही रुप धारण करु शकतात. असं माझं मत नाही बरं का, राजकुमार कोहली नामक मल्टीस्टारर सिनेमांचा कारखाना चालवणार्‍या महाभागाच्या एका सिनेमाची सुरवातच या अचाट वाक्याने होते. हा राजकुमार कोहली म्हणजे खंडीभर कलाकार घेऊन तीन तासाच्या सिनेमात त्यांना कोंबून कोंबून बसवण्यात पटाईत माणूस. याचा राजतिलक हा सिनेमा तर एंटीटी-रिलेशनशिप डायग्राम आणि फ्लो चार्ट काढणार्‍यात एक्सपर्ट असलेल्यांचंही डोकं गरगरेल असा प्रचंड कॉम्प्लेक्स प्रकार आहे.