वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥
याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते.
मिसळपाव
जन्मजात शारीरिक दोषांच्या विविध कारणांमध्ये गुणसूत्रांमधील बिघाड हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा प्रकारच्या आजारांमध्ये डाऊन सिंड्रोम(DS) हा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. मुलांमधील आकलनदुर्बलतेचे ते सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. जॉन डाऊन या ब्रिटिश डॉक्टरवरून नाव दिलेल्या या आजाराचा आधुनिक वैदयकात सुमारे 175 वर्षे अभ्यास झालेला आहे. सुमारे 800 नवजातांपैकी एकाला हा आजार असतो. अशा या बहुपरिचित आजाराचा सविस्तर आढावा या लेखात घेतो.