Skip to main content

लेबलं

लेखक mayu4u यांनी सोमवार, 07/05/2018 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारच्या बाजूने बोललो तर भक्त. सरकार विरोधात बोललो तर देशद्रोही. हिंदू धर्मविरोधात बोललो तर बुबुडाउविपुमाधवि*. हिंदू धर्माच्या बाजूने बोललो तर सनातनी, हिंदुत्ववादी, प्रतिगामी. जातीव्यवस्थेविषयी बोललो तर बामणी, मनुवादी. जातीव्यवस्थेविरोधात बोललो तर आंबेडकरवादी, फुलेवादी. खर्चाच्या बाजूने बोललो तर भांडवलशाही. काटकसरीच्या बाजूने बोललो तर समाजवादी. स्त्रियांना विशेष अधिकार असावेत बोललो तर फेमिनाझी. स्त्रियांना विशेष अधिकार नसावेत बोललो तर एमसीपी. प्रार्थनेच्या बाजूने बोललो तर आस्तिक. कर्मकांडाविरोधात बोललो तर नास्तिक. आठवणीतून एखादा किस्सा सांगितला तर खोटारडा, फेकू. मुद्द्याच्या समर्थनार्थ

माझ्या ब्लाॅगचा उदयास्त

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 07/05/2018 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा डोळ्यात लोलक होते समोर निळी स्वप्नं होती बोटाबोटात परीस होते ओठी अनवट गाणी होती आव्हानांची करंदकाळी धोंड वाट अडवायची लेखनलाट भिडून तिला नेस्तनाबूत करायची कीबोर्डावर माझी बोटं वीज लाजेलशी लहरायची उमटायची मग स्क्रीनवरती भळभळ शब्दापल्याडची पोटामागे आज धावतो वेगाने, पण विझली आग, धार विसरली बोथट छिन्नी, सरणावरती माझा ब्लाॅग अजून जेव्हा कुंद सकाळी माझा ब्लाॅग साद घालतो लाॅगिन करून सृजनचितेला मीच चुपचाप चूड लावतो

कोकणातले नवे ठिकाण

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 07/05/2018 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण म्हटले की माडांच्या बनात नटलेले समुद्रकिनारे, लाल मातीच्या गच्च झाडोर्‍यातल्या डोंगरदर्‍या आणि जिव्हालौल्य पुरवणारे आंबेगरे, जीभ रंगवणारी जांभळे, करवंदे तोरणे, जाम इ. रानमेवा समुद्रखाद्य हे सारे डोळ्यांसमोर येते. पण एक आगळेवेगळे रौद्रसौंदर्य एका नव्या ठिकाणी आढळेल. https://prathameshshirwadkar.wordpress.com/2018/05/05/suryast_darshan/#… इथे वाचायला मिळेल इथल्या वाचकांना आवडेल असे वाटते. कुणीतरी जाऊन मस्त प्रवासवर्णन इथे टाकेल जर वाचायला मज्जा येईल.

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! Simple, Free Image and File Hosting at MediaFire ( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र ) नुकत्याच संपलेल्या साली म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली.

दोसतार-७

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/05/2018 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42384
आपली पर्यवेक्षक सरांच्या जुलमापासून आपली सुटका केली. आपली सुटका करणे हे त्या माशाच्या तुकडीचे कार्य होते. टंप्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. त्याने या अवस्थेत किमान एक तासभर तर रामाच्या देवळात कीर्तन केले असते. आपल्याला भगवंताने कोणते कार्य करायला पाठवले असावे हे सांगता येईल का? यल्प्याच्या या प्रश्नाचे उत्तर टंप्याच काय पण आमच्या तिघांचे पालकही देऊ शकत नव्हते.
शाळा सुरू होते तीच मुळी पावसाच्या सोबतीने. गावात पाऊस सुरू होण्याची तारीख ७ जून. शाळा सुरू होण्याची तारीख पण तीच.

कोहम्

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात.

गर्दीमधले एकटेपण

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांचा घोळका आजूबाजूला असतो. आपली (म्हणजे केवळ नात्याने आपली. ती खरोखरंच आपली असतात का हे कोडंच!) म्हटलेली माणसं आपल्या जवळ असतात. सोशल मिडिया वर शे-दोनशे माणसं ‘कनेक्टेड’ असतात. आणि तरी देखील आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा या भाऊगर्दीत मी एकटा आहे असं वाटायला लागतं. कशामुळे होत असावं हे असं? जरी आपण या जगात कोणीच नाही हे जरी मनाला पटविण्याचा प्रयत्न केला तरी ते मनोमन स्वीकारणं कठीण असतं. आपल्या सुखदुःखांशी कोणालाच म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे आपल्या म्हटलेल्या माणसांना देखील काहीच देणंघेणं नाही हे वाटणं ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा असते असं मला वाटतं.

कर्मण्येवाधिकारस्ते...

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 06/05/2018 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात. जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस.

रात्रीच्या अंधारात...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या अंधारात... ... रात्रीचे सव्वाबारा वाजलेले. देवळातलं किर्तन संपलं आणि श्रोते पांगले. चारपाच उनाड पोरांनी बाजारपेठेतल्या एका दुकानाच्या कट्ट्यावर अड्डा ठोकला. गावातल्या लफड्यांपासून गरीबी हटावच्या राजकारणापर्यंतचे सगळे विषय चर्चेला येत गेले आणि गप्पांचा फड भलताच रंगला... अचानक चारपाच बायका घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत धावत येताना दिसल्या, आणि गप्पा थिजल्या. किर्तनानंतर घरी, वरच्या आळीत निघालेल्या त्या बायका माघारी फिरल्या म्हणजे वाटेत कायतरी गडबड होती हे टोळक्याने लगेच ताडले. तोवर त्या बायकाही समोर आल्या होत्या. घाबरलेल्या!! ‘माळावरच्या शाळेवर कुणीतरी आहे...