Skip to main content

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 09/06/2018 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं    " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ?

मिरगाचा पाऊस -अप्लाईड खगोलशास्त्र

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 08/06/2018 16:18 या दिवशी प्रकाशित केले.

तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड मिरगातच करायची. त्यानुसार आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर बांबुची लागवड मिरगामध्ये केली. ज्या बांबुच्या रोपाला पुढ्च्या वर्षी फुलोरा आला, तेवढे सोडुन जवळ जवळ ९५% बांबुची रोपे जगली व पुढच्या वर्षी अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुध्दा आमच्या बांबुंना जमीनीमधुन नवीन कोंब आले.

जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना.

पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/06/2018 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र महिना येतो आणि उन्हाच्या काहीलीने समस्त जीव कातावलेले असतात. धरतीही भेगाळून सुस्कारे टाकत असते, डोंगर करपून काळे झालेले असतात. सगळेच आसूसलेले असतात, पाण्याच्या थेंबाना. वैशाख संपत येतो ,गार वारे वाहू लागतात आणि अशातच एक दिवस "तो" येतो. पश्चिमेला आकाशात काळी धुसर रेषा उमटते, बघता बघता जवळ येउ लागते आणि काळेकभिन्न ढग आकाश व्यापून टाकतात.

आईचा मुलगा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

राजयोग - ११

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच दिवशी संध्याकाळी नक्षत्ररायला पाहताच धृव पळत पळत त्याच्याकडे गेला. त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालून आधी त्याच्या कपाळाला आपलं कपाळ लावलं. मग त्याच्या गालाला गाल लावून "काका!" म्हणत त्याला बिलगला. नक्षत्र त्याला म्हणाला, "छि. असं नाही बोलायचं. मी तुझा काका नाहीये." आजपर्यंत नेहमीच धृव त्याला काका म्हणून हाक मारत असे, आज अचानक नक्षत्ररायने त्याला दटावल्यावर धृवला आश्चर्य वाटलं. काही वेळ तो गंभीर चेहरा करून शांत बसला.

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.