Skip to main content

स्मृतीची पाने चाळताना: चार

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 01/08/2020 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले.

पुस्तकांची मांदियाळी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/08/2020 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अलीकडे प्रचंड प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होत असतात. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही रोज अनेक प्रका‍शन संस्था स्थापन होत असूनही त्या कमी पडतात म्हणून अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: स्थापन केलेल्या प्रकाशनाच्या नावाने पुस्तकं प्रकाशित करत आहेत. नक्की आकडा सांगता येत नसला तरी महाराष्ट्रात रोज कमीतकमी पंचवीस पुस्तकं प्रकाशित होत असावीत. या हिशोबाने महिण्याला सातशे पन्नास तर वर्षाला नऊ हजार पुस्तकं प्रकाशित होत असावीत. इतकी पुस्तकं कोणताही एक वाचक वाचू शकत नाही.

हागिया सोफियाचे निमीत्त

लेखक माहितगार यांनी शनिवार, 01/08/2020 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्‍याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे. काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ? एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ५ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 31/07/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ ) बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले.