Skip to main content

अण्णा गायले!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/12/2007 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली! प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली! मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?

अखाडा - गझल

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/12/2007 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण. केश्या, आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं. झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो.

पुराणातली वांगी

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 09/12/2007 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो !! काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की ज्यांना पाहिल्यावर वाटतं ते किती भाविक ? पण दिसतं तस नसतं. काही वेळा लोक अपरिहार्यतेमुळे भक्ती करीत असतात. पण त्यांच्या माथी उगाच शेंदूर लावला जातो. ते बिचारे त्यांचं आयुष्य जगत असतात. या विषयावरील एक किस्सा. एका खेड्यात नामसप्ताह आयोजित केला होता. एका विद्वान बुवांना त्यात कीर्तनासाठी बोलावले होते. गावातल्या विठ्ठलमंदिरात दिवसभर भजन, नामस्मरण, पूजाअर्चा आणि रात्री या बुवांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम. बुवांना विचित्र अनुभव आला. बुवांचं कीर्तन सुरू होतांना, गावातले सगळे लोक उपस्थित असायचे पण हळूहळू एकएक जण कटायला लागायचा.

बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 07/12/2007 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी ‌"ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा. १. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता.

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 07/12/2007 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही. खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.

बम भोले बम

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 06/12/2007 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी. दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो. गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 05/12/2007 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!