Skip to main content

भक्तीची शक्ती...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 16/12/2007 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
भक्तीची शक्ती... मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं.

मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?

लेखक धनंजय यांनी रविवार, 16/12/2007 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिसळपावाची "घटना" किंवा "नियमावली" लिहिण्याबाबत चर्चा होत आहे. या बाबतीत "लोकशाही" हा शब्द पुष्कळदा वापरात आलेला दिसतो. देशांच्या/राज्यांच्या बाबतीत लोकशाही म्हणजे काय, याबद्दल आपण नागरिकशास्त्रात शिकलेलो आहोत, आणि जगातील विविध उदाहरणांनी "राज्यात लोकशाही म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. राज्यातले "लोक" कोण? याबद्दल एकमत नसेल तरी जवळजवळ एकमत आहे. राज्यात हक्काचे रहिवासी हे त्या राज्यातले लोक.

निःश्‍वास

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/12/2007 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.

एक दिवस...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/12/2007 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास...

जाहिर आवाहन

लेखक महेन्द्र यांनी शनिवार, 15/12/2007 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमंत तात्या साहेब (मिसळपाववाले) यांना जाहिर आवाहन तात्या..... पुन्हा एकदा सर्वांकडुन हस्ताक्षर गोळा करुन आपले अनमोल बहुमोल विनामोल निष्कर्ष जाहिर करावेत महेन्द्र

नियंत्रणा बाहेर चाललेला ड्रुपल

लेखक कोलबेर यांनी शनिवार, 15/12/2007 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली. पण आता त्याही पूढे जाऊन ड्रुपलमध्ये नुसतेच मराठी लिहिण्याची सोय नसून ड्रुपल स्वत:च मराठीत बोलू लागला आहे. तांत्रिक बिघाडामूळे तो जे प्रतिसाद उडवतो त्यावर ड्रुपल आता, ' पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!' कळावे, (लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती अशी सही देखिल ठोकून देतो.

विनोद

लेखक मनोज यांनी शनिवार, 15/12/2007 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(मैल वरुन साभार) गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? चिंटु: माहित नाही गुरूजी. गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५ चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.