Skip to main content

कुणी मत देता का मत?

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 26/01/2008 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे! झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो? कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून? खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो! कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात? कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून? तसं काही नाही बाबा
Taxonomy upgrade extras

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...
Taxonomy upgrade extras

संथ चालते मालिका ही...

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 26/01/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

बोधकथा

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 26/01/2008 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या.

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 25/01/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं.... .....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंब

किरीट सोमय्या यांचा आरोप , म.टा.तील लेख.

लेखक शरुबाबा यांनी शुक्रवार, 25/01/2008 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
किरीट सोमय्या यांचा आरोप सोमवार व मंगळवारी झालेली शेअर बाजाराची घसरण काही बड्या दलालांना फायद्याची आणि लाखो किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र तोट्यात ढकलणारी होती. या माकेर्ट क्रॅशची चौकशी करावी, कुणाला फायदा झाला याचा शोध घ्यावा आणि सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे. या क्रॅशचा फायदा विदेशी वित्त संस्था, मोजके बडे दलाल आणि काही प्रमोटर्सना झाल्याची आपली माहिती असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सोमवार व मंगळवारचा क्रॅश हा माकेर्ट स्कॅमच असल्याचा आरोप त्यांनी केला.

खच्चीकरणाची पंचवीस वर्षं.. म.टा.तील लेख.

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 25/01/2008 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख मनाला भिडला. ७९ साली जन्मलेल्या मला यातील काहीच कल्पना नव्हती. फक्त दत्ता सामंत यांच नाव कधितरी कानावर पडलं होतं. पण या लेखाने मन हेलावून गेलं. डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला यावर्षीच्या १८ जानेवारीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो.

खराखुरा पीजे !! ऐकावं ते नवलचं !!!

लेखक सुनील यांनी गुरुवार, 24/01/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
झारखंडच्या एका न्यायाधिशाने राम आणि हनुमान यांच्या विरुद्ध समन्स काढले. अपूर्ण पत्यामुळे ते परत आले तेव्हा त्यांनी स्थनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन राम आणि हनुमान यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले!!! हा पहा दुवा - बातमी

एक सूचना...

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 24/01/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक विनम्र सूचना... मिसळपाववरील ज्या मंडळींचे लॉगईन आयडी रोमन अक्षरात असतील त्यांनी कृपया ते बदलून देवनागरीत करावे, ही विनंती... धन्यवाद, आपला नम्र, सरपंच.

पहिले जागतीक(ऑनलाईन) मिसळपाव साहित्य संमेलन

लेखक इनोबा म्हणे यांनी गुरुवार, 24/01/2008 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्‍या या संमेलनाकरिता बर्‍याच गावकर्‍यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील.