Skip to main content

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.

शाल्मली...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 08/03/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं... "शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे...

श्रेष्ठ मराठी कादंबर्‍या

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 08/03/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील काही श्रेष्ठ कादंबर्‍याची माहिती कुणी देउ शकेल काय? जसे-- पडघवली-गोनीदा तुंबाडचे खोत- श्री. ना. पेंडसे मुखवटा-अरुण साधू ययाती- वि. स. खांडेकर ---- (वाचनप्रेमी) वल्ली

जन्मा येण्या कारण तू..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/03/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मा येण्या कारण तू, प्रितीचं अभिसारण तू सारे जीवन फ़ुलवणारी, सुखाची पाखरण तू वसंताचं आगमन तू, कंच हिरवा श्रावण तू सावळ्या नभी फ़ुललेलं, शरदाचं चांदण तू सळसळणारं यौवन तू, निळंजांभळं गगन तू क्षितिजावरती पसरणारं, लोभस सूर्यकिरण तू लावण्याची उधळण तू, नात्यांमधली गुंफ़ण तू अनेक धागे बांधणारं, एक अतूट बंधन तू दु:खाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू गंधभरल्या फ़ुलाफ़ुलांचं, सुंदर मोहक अंगण तू.. शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्‍यातलं चंदन तू भाळावरचं गोंदण तू, नवरत्नांचं कोंदण तू विसवण्या या जगताला गे, मिळालेलं आंदण तू - प्राजु सर्वांना महिलादिनाची हार्दिक शुभेच्छ
काव्यरस

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/03/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली.

संकेतस्थळे आणि खाजगी मालकी - एक मुक्तविचार

लेखक वाचक यांनी सोमवार, 08/03/2010 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुसर्‍या एका धाग्याच्या निमित्ताने (पुन्हा) हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासंदर्भाने बर्‍याच दिवसांपासून मनात आलेले विचार शब्दबद्ध करतोय, सगळ्यांचा वैचरिक सहभाग अपेक्षित आहे, कृपया वैयक्तिक टीकेऐवजी मुद्द्यांना प्राधान्य देणे. माणूस संकेतस्थळ का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आधी वाटलं - माणसाची आदिम प्रेरणा "मला काही सांगायचय" ही असावी. पण नंतर थोडा विचार केला असता असे लक्षात आले की 'मला जे सांगायचय' त्यासाठी इतर 'फुकट' अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की ब्लॉग, दुसरी संकेतस्थळे.

इमर्जन्सी! -१

लेखक प्राजु यांनी रविवार, 07/03/2010 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
इमर्जन्सी.. दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं.

हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

लेखक मंगेशपावसकर यांनी रविवार, 07/03/2010 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही... तात्या." असे बजावण्यात आले. हि यांची भाषा !!

ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 07/03/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते: १. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही.

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/03/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52…