जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड
आज १३ एप्रिल. ९२ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत.
मिसळपाव