चक्रावळ
प्रत्यक्षात ही कथा मिपावर काय किंवा मीम वर काय सारखीच :) तरीही अंगातल्या खोड्या जात नसल्यानं इथे पोष्ट करतोय !
चक्रावळ
दिवसभराच्या दगदगीनं वैतागलेला निखिल शेवटी न जेवताच ताईच्या घरातून निघून रेल्वे स्टेशनवर आला. संध्याकाळपासून ज्या काही गोष्टी त्याने पाहिल्या होत्या त्या खरंच त्रासदायक होत्या. एरव्ही कधीही त्याने असा थिल्लरपणा चालू दिला नसता पण.. शेवटी हे घर त्याचं नव्हतं त्याच्या मोठ्या बहिणीचं होतं ती आणि तिचे पती ज्या गोष्टी योग्य समजतील तशाच तिथे घडणार होत्या.
मिसळपाव
आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला
मी: काय रे काय करतोयस ?
तुषार: काही नाही रे !!! आराम चालू आहे.
मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ.
तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो.
मी: ठीके !!!
आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते.