Skip to main content

निसर्ग दत्त महाराज

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 20/11/2012 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
. निसर्ग दत्त महाराज नवा विचार.... नवी दृष्टी . *म्हणजे याचा नेमका अर्थ असा का?????????? *हातामध्ये सोनचाफ्याचे फुल जरूर घ्या पण त्याचा वास घेवू नका .... असेच ना ???? *असे असावे का? कि ..वास घ्या..आनंद अनुभवा....आणि पुढे चला... सारखा वास घेत बसू नका..... *आनंद अनुभवा....आणि पुढे चला...>>>> नुसते एव्हडे नाही चालणार तर त्यामागे धावू नका , विरक्त व्हा ! *निसर्ग महाराज नवा विचार.... नवी दृष्टी .. -जय हो............

यक्कू क्रूरसिंग..

लेखक गवि यांनी मंगळवार, 20/11/2012 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
यकुविषयी ती घाणेरडी बातमी इथूनतिथून पहिल्यांदा कानावर आली तेव्हापासून सुरुवातीला डिनायलमधे जाणं पसंत केलं. नंतर वर्तमानपत्राची लिंक आणि त्यातला स्पष्ट उल्लेख.. आणि सगळीकडून येणारी कन्फर्मेशन्स यामुळे एकदम लटपटायलाच होत होतं. आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय.

दु:खाला गालबोट!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 20/11/2012 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
बाळासाहेब ठाकरे गेले हे अत्यंत वाईट झाले पण त्यानिमित्त जो बंद पुकारला गेला त्याविरुद्ध एका तरुणीने फेसबुकवर सौम्यसा निषेध व्यक्त केला आणि तिच्या एका मैत्रिणीने ते लाईक करुन आपले समर्थन व्यक्त केले तर पोलिसांनी दोघींना तात्काळ अटक केली. समाजातील विविध घटकात तेढ निर्माण करणे असला काहीसा आरोप होता. माझ्या मते हे अतिरेकी आहे. जबरदस्तीने बंद लादला तर निषेध व्यक्तही करायचा नाही हा जुलूम आहे. ही लोकशाही नसून मोगलाई आहे. खुद्द ठाकर्‍यांना असली जोरजबरदस्ती आवडली नसती असे मला वाटते. एखाद्याच्या बंदविरोधी मतावर इतकी टोकाची भूमिका घेणे हे व्यक्तीप्रेमाचे स्तोम वाटते.

नाविन्याची साद

लेखक जयवी यांनी मंगळवार, 20/11/2012 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुटला पहाट वारा अंतरात सळसळ मन सुगंधी सुगंधी पसरला दरवळ नको स्वप्नातून जाग नको जाग इतक्यात नीज हलके हलके पुन्हा आली पापण्यात कसा मुजोर हा वारा रेंगाळला खिडकीशी पावा मंजुळ मंजुळ जणु कृष्णाचा कानाशी मन सैरभैर झाले वेडावले, खुळावले कृष्ण रंगाने रंगाने चिंब चिंब भिजवले रेशमाच्या सोनसरी आला सोबती घेऊन ओला पाऊस पाऊस ढगातून उतरून सतरंगी झाले नभ धरा पाचूने नटली ऊन कोवळे कोवळे पसरली गोड लाली आज सृष्टी देते हाळी ऐक नाविन्याची साद सुख दारात दारात दे तयाला प्रतिसाद. जयश्री

यकु

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 19/11/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
यकु गेला. इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून. मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. यकु गेला. अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न. अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं.

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

लेखक रसायन यांनी सोमवार, 19/11/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनंतर मी, पुन्हा तुझ्यासाठीच लिहिणार आहे माझ्याच नकळत मी आज तुझ्याशी बोलणार आहे तु कोण आहेस?कशी आहेस?...माहित नाही ह्यां शबदांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे असशील तु हसरी,थोडी लाजरी स्वप्नांमध्ये रमणारी असशील तु ही माझ्यासारखीच भावविश्वात जगणारी तुझ्याशी भेट होईल की नाही..? हे मलासुद्धा ठाऊक नाही ह्या मनःपटलावरचे चित्र पुसता पुसल्या जात नाही तुला आठवुण तुझ्यावर लिहिणं हेच तर कवितेचं कारण असतं ! खरं सांगु, तु नसताना तुला अनुभवणं "ह्या बेहोशितचं जगणं असतं"

स्वातंत्र्याची सकाळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 19/11/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
भोवताली सर्वत्र अंधार आहे,सगळीकडे त्याचाच संचार आहे कोण कुणाच रक्त पितोय,कुणी आपलेच खिसे भरतोय ज्याला काही जमत नाही तो मात्र हताशपणे बघतोय पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.................. अंदाधुंदी माजली आहे,जो तो मनाला येईल तसे वागतोय स्वतः बरबटलेला आहे पण दुसऱ्याच्या शुद्धतेचा पुरावा मागतोय यातून पुढे काय साध्य होणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.................. एकेकाळी सोन्याचा धूर होता,आज दारिद्र्याचा पूर आहे बासष्ट वर्षे झाली तरी लक्ष्य अजून खूपच दूर आहे ज्या दिशेला धावतोय ती बरोबर का चूक ते कसे कळणार आहे? कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.......

राम लड्डू (दिल्ली चाट)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 19/11/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
. राम लड्डू साहित्यः ५-६ तास भिजवलेली १ वाटी पिवळी मुगाची डाळ ५-६ तास भिजवलेली १/२ वाटी चणा डाळ १ बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथींबीर चवीनुसार मीठ . पुदीना चटणी साहित्यः मुठभर कोथींबीर मुठभर पुदीना १ बारीक

नवयुगाची नार

लेखक बरखा यांनी सोमवार, 19/11/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नवयुगाची नार पुजिले कोणी मला देवता मानुनी भोगिले कोणी मल दासी समजुनी ब॑ड करता स्वतासाठी ठेविले डा॑बुनी कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी अपेक्शील्या ईच्छा किती त्यागमुर्ति समजुनी कितीदा तरी मेले जगताना मनातुनी १ उभी उ॑बरठ्यावर नवशतकाच्या आठवणी मनी या गत काळाच्या झगड्ले विरोधात मी पर॑परेच्या सोसल्या,साहिल्या यातना दु:खाच्या सा॑गु किती कहाण्या मी माझ्या त्यागाच्या जाणिवल्या नाही तरी वेदना जखमेच्या २ अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित स॑साराचा कणा पण मान नाही घरात यशाचे सारे धनी,अपयश माझ्या पदरात का? कोणासाठी?

सहकारातून सम्राटाकडे

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 19/11/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
३००० रुपयांचे मृगजळ व किमान २७०० रुपयांचा पहिला हप्ता या वाटेकडे आस लागलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेवटी २५०० रुपयांची गाजरे खाण्याची वेळ आली आहे. उस हंगाम सुरु झाला कि शेट्टी व साखरसम्राट यांच्यातील कलगीतुरा सर्वांनाच अंगवळणी पडलाय. दोन-तीन जाहीर सभा, एक-दोन ठिकाणी रास्तारोको, उस अडविणे, टायरमधील हवा सोडणे व नंतर तडजोड हि पारंपारिक चौकट सोडून अनपेक्षित रीतीने यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.