आताची परीक्षापध्दती - योग्य की अयोग्य?
सरकारच्या नवीन धोरणांनुसार शिक्षण पध्दतीत्त अमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. सतत नवीन प्रयोग चालू आहेत. परीक्षांचे स्वरूप बदलले आहे.आठ्वीपर्यंत ओपन बूक टेस्ट आणि नववीला एकदम दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम!! सर्वंकश मूल्यमापन करताना, विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे कमी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी माझ्या मुलाचे दप्तर उचलू शकत नाही, तो कसे उचलतो देव जाणे. नवीन धोरणानुसार अभ्यासाच्या बरोबरीने उपक्रम, प्रकल्प, ग्रुह्पाठ, वर्गपाठ अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे लिखाण पूर्ण करताना मुलगा कारकुनी तरी उत्तम करील यात शंका नाही. दप्तराचे ओझे उचलून उचलून हमालीची पण सवय झालीच आहे!!
मिसळपाव
सर्व मिपाकरांना नमस्कार.
सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.