Skip to main content

बसल्यानंतर ची मजा,

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 04/01/2014 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्यानंतर ची मजा, दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात.

मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 03/01/2014 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग- "त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता" संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.

रेसिडेंट एरिया मधील इंडस्ट्री ...

लेखक mahajana cha ganya यांनी शुक्रवार, 03/01/2014 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सहा महिन्या पूर्वी नवीन फ्ल्याट घेतला . सोसायटी जवळ एक इंडस्ट्री आहे जिचा आवाज दिवस रात्र येत आसतो . त्यात काम करणारे कामगार दिवस रात्र एक मेकांची आई बहिण मोठ्या आवाजात काढत आसतात . आवाजाच्या त्रासाची कंपनी च्या मालक कडे तक्रार करून उपयोग झाला नाही ..कोणाकडे तक्रार करावी कुणाला माहिती आहे का .

दुर्ग भांडार अर्थात किल्ले ब्रम्हगिरीचा दुर्लक्षित परंतु रोमांचक भाग

लेखक Hrushikesh यांनी शुक्रवार, 03/01/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिककर असल्यामुळे तसे बरेचदा त्र्यंबकेश्वर, गंगाद्वार, अंजनेरी, वणी येथे जाणे झाले होते. खरेतर यावेळी आमचे खासे मित्र नयनीश अमेरिकेतुन आल्यावर रतनगडाची मागील वेळी फसलेली मोहीम पार पाडायचे ठरले होते. पण संदीप ने अगदी वेळेवर टांग मारल्यामुळे दोघे जाऊ शकतील व जवळ असेल असे एखादे ठिकाण हवे होते.. रामशेज, अंजनेरी यापेक्शा आम्ही मग ब्रम्हगिरीला पसंती दिली. ज्योतिर्लिंग असलेल्या या क्षेत्राला शिवाजी महाराजांचेही पाय लागले होते. सुरत लूटी वेळी महाराजांचा येथे मुक्काम होता. तसेच त्यावेळी ही लुट काही दिवस सुरक्षित ठेवण्याचे काम याच दुर्ग भांडार - ब्रम्हगिरी जोड्गोळीने चोख पार पाडलेले होते.

अलिबाग परिसरात फिरायला जाणेबाबत माहिती हवी आहे.

लेखक स्मिता श्रीपाद यांनी शुक्रवार, 03/01/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शनिवार रविवार दोन दिवस कुटूंबासहित अलिबाग ला जायचे आहे. सोबत दोन छोट्या मुली ( वय वर्षे ३ व १ ) आहेत. अलिबाग चा बीच फरसा चांगला नाही असे ऐकले आहे. पण अलिबाग च्या शेजारील बाकी बीचेस बद्दल चांगले आणि वाईट असे दोन्ही गोष्टी वाचल्या. नागव, अक्शी, किहिम, आवस या पैकी कोणता बीच जास्त सेफ आहे ? तसेच घरगुती पण सर्व बसिक अ‍ॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का? छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठीकाण असेल तर कृपया सुचवावे. धन्यवाद.

भरारी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 03/01/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ?? ………………………. अज्ञात
काव्यरस

मध्य प्रदेश सहल - ४ दिवस फिरण्याचे !

लेखक आनंदराव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी जायचयं,कुठेतरी जायचयं, असं आम्हां उभयतांना बरेच दिवस चालले होते. अनेक लोकांशी चर्चा झाल्या, अनेकांनी अनेक ठीकाणे सुचवली. काही तर परदेशातली होती.पण तिकडे जायचे नव्हते. मग मिपा च्या सदस्यांकडून मदत मागितली.http://www.misalpav.com/node/26383 जरा सांगा कुठे जाऊ ! हक्काची विनंती केली. मिपा सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. खूप ठिकाणे सांगितली. पण परत प्रोब्लेम ! एवढी ठिकाणांची लिस्ट बघुन आम्ही कनफ्युज ! कारण सगलीच ठिकाणे बघण्यासारखी होती. मग आम्ही उभयतांनी फायनल चर्चा करुन मध्य प्रदेशात जायचे ठरवले.

नमिताचा क्लास (शतशब्दकथा)

लेखक आदूबाळ यांनी गुरुवार, 02/01/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती. बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला. क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..." आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 02/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.