Skip to main content

लवकरच येत आहे: चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 17/08/2014 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल) काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये. कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे.

अल्ला जाने

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/08/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओळखिच्या परीवारातिल एका मुलाचे मुस्लिम मुली बरोबर प्रेम जुळले..अर्थात घरातुन त्याला फारशी मान्यता नव्हति... या संधर्भात चर्चा चालु असताना एक माहिति मला मिळाली.. मुसलमान मुलाबरोबर जर हिंदु मुलिने लग्न केले तर नैसर्गीक न्यायाने ति व तिला होणारी संतति हि मुसलमान समजली जाते.. पण जर एखाद्या हिंदु मुलास मुसलमान मुली बरोबर लग्न करायचे असेल तर त्याला धर्मांतर हाच पर्याय असतो.. प्रत्येक मशिदि मधे मुसलमान लोकांच्या नावाचे रेकॉर्ड असते.. हिंदु मुलास "नामके वास्ते" तरी मुसलमान करुन त्याच्या नावाची नोंद मशिदित केली जाते..सलिम..अकबर ईत्यादी नावाने..... व समाजत त्याला हिंदु नावाने वावरण्यास संमति दिली

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 17/08/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने.... फोटोमधुनही बघतात बाबा..! बिनधास्त जग तू, वदतात बाबा..! नाहीत बाबा, हे मान्य नाही; माझ्यात राहुन जगतात बाबा..! झोळी रिकामी माझी तरीही; प्रेमास हृदयी भरतात बाबा..! पाठीवरी तेंव्हा हात फिरला... तो आठवा, मग कळतात बाबा..! तू मान किंवा मानू नको, पण.. असतेच आई, असतात बाबा..!

शकू

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/08/2014 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती.. लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती.. तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या.. गोदाक्क

दाक्षिणात्य भाषातील शब्दांची देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी

लेखक माहितगार यांनी रविवार, 17/08/2014 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे. मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे. या धाग्या अंतर्गत पहिला शब्द കാഞ്ഞങ്ങാട് भाषा मल्याळम केरळराज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक गाव / शहर കാഞ്ഞങ്ങാട് याचे देवनागरी- मराठी लेखन ' काञ्ञङ्ङाट् ' असे होते याची जवळपास निश्चित माहिती मिळाली आहे.

< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 16/08/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव". २. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला. ३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले. ४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले. ५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं. ६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे.

बेबी

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 16/08/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?', कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती. जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली, 'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,' डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला, 'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,' हे एकताच तीने आपले जो

भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी

लेखक पारस यांनी शनिवार, 16/08/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान". २. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला. ३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले. ४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या. ५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे. ६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे. ७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३ मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे. ८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले. तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे. ९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली. १०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.

बोर्डिंग गेम्स्

लेखक समर्पक यांनी शनिवार, 16/08/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रवासवर्णनामध्ये या खेळांचा उल्लेख केला, तेव्हा एका प्रतिसादामध्ये अधिक माहितीविषयी विचारणा केली होती, त्यासाठी हा लेख. संदर्भासाठी साठवणीतीलच छायाचित्रे वापरली आहेत.