Skip to main content

ग्रंथसखा -श्याम जोशी

लेखक अजया यांनी सोमवार, 20/10/2014 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे . बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.

पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) जॉर्डन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 20/10/2014 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

एक नाते - अनोखे

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 20/10/2014 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाते — अनोखे

     माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात.

नरकचतुर्दशी

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 20/10/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्‍या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा.

पाटिशप्ता

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/10/2014 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाटिशप्ता बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच. पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली. घ्या तर मग... दिवाळीला घरच्यांना हा वेगळ्या चवीचा पदार्थ खायला घालून आनंद द्विगुणित करा.

आजही माझ्याचपासुन दूर मीही

लेखक स्नेहदर्शन यांनी सोमवार, 20/10/2014 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजही माझ्याचपासून दूर मीही तू जशी आहे तसा मजबूर मीही भेटण्या जितकी मला उत्सुक असते ये, व्यथे ये, तेवढा आतुर मीही जेवढे जातो जवळ, ती लांब जाते वाटते आता राहावे दूर मीही लागला होता तिला माझा लळा पण, प्रेमही केले तसे भरपूर मीही एवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे, जाहलो बघ खेळताना क्रूर मीही सांगणारे सांगता लाखो कहाण्या नीट आता वाचतो मजकूर मीही ----स्नेहदर्शन​

भाषेची विभक्ति

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 20/10/2014 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर, मराठी, तिची अस्मिता, अभिमान वगैरे यांचा विचार तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी करणं, म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. तो करण्याची जबाबदारी ठराविक लोकांकडे सोपवलेली आहे. ते लोक वेळ बघून, सोयीस्करपणे तो करतही असतात. पण क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतोच आपण. असाच मीही घालवत होतो. पेपर वाचत होतो. एक बातमी अगदी ठळक छापलेली दिसली. श्रीनगरच्या पुरात इतके इतके मराठी लोक अडकले. बातमी वाचून राग आला. राग याचा की श्रीनगरचा पूर हे राष्ट्रीय संकट आहे. असं असताना त्यात इतके मराठी अडकले, इतके बंगाली अडकले, इतके तामिळ अडकले...

कविता कशी उपभोगावी

लेखक शरद यांनी सोमवार, 20/10/2014 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
कै. इन्दिरा संतांनी म्हटले आहे " कूकर लावून शिटी होईपर्यंत कथा वाचून होते. जेवण झाल्यावर लोळत लोळत कादंबरी वाचून बाजूला करता येते पण कवितेचे वाचन असे करता येत नाही. कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते " कवयित्री म्हणून त्यांनी काव्याला झुकते माप दिले आहे कां ? मी कविता करत नाही तरीही मला तरी तसे वाटत नाही.. शालेय कविता ( त्यातल्या आजही बर्‍याच पाठ आहेत) सुरेख होत्या पण त्या भावकविता नव्हेत.

कथा

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 20/10/2014 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. यशोधरा यांची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ****************** भिवाण्णा पार सटपटून गेला होता.... गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता!