Skip to main content

महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/11/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ? २. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ? ३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ? ४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ? ५.

ग्रेट भेट - राजगड आणि आप्पा परब

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 10/11/2014 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
रा'जांनी ज'गलेला गड रा'जपण ज'पणारा गड रा'जांचा ज'वळचा गड रा'जधानीचा ज'बरदस्त गड 1 प्रातःकिरण वरील विस्तारित शब्दांना विशेष अर्थ नाही. राजगडाची आठवण काढल्यावाचून राहणं कठीण होतंय, म्हणून आपलं काहीतरी. पहिल्या वेळेस राजगड भेट झाली तेंव्हाच पुन्हा यायचं हे निश्चित केलं होतं. त्या 'पुन्हा' चा जो योग आला तो फार वेगळा आणि विशेष होता. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राजगड पदभ्रमण मोहीम आयोजित केली गेली आणि सोबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब असणार अशी माहिती फेसबुकवर बघितली. आप्पांना आधीही भेटलो होतो, त्यांची पुस्तकं वाचलेली आहेतच.

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 10/11/2014 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.

विसावा भाग १

लेखक मालविका यांनी सोमवार, 10/11/2014 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
विसावा २०१०मध्ये आम्ही (मी आणि नवरा)आम्ही ब्लेक फोरेस्टच्या ट्रिपला होतो.बरेच दिवस फिरायला जायच म्हणत होतो पण कुठे ते ठरत नव्हत.शेवटी घाई गडबड नको,दगदग नको असा विचार करून आम्ही ब्लेक फोरेस्टची निवड केली.फार फिरायचं नाही पण जाऊन ४ दिवस विश्रांती तरी घ्यायची.दोघानाही रोजच्या दिनक्रमातून काहीतरी विसावा हवा होता.शिवाय तेव्हाच मी गरोदर असल्याने अजिबात धावाधाव करायची नव्हती.फक्त विश्रांती साठी जायचं हे पाहिलं आणि मग तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहन असा आमचा एकूण मूड होता.अशा मूड साठी ब्लेक फोरेस्ट हे योग्य ठिकाण आहे. सुरवात तयारीपासून होती.कुठून जायचं,कस जायचं याची माहिती इंटरनेट वरून काढायची काढायची त्य

महाराष्ट्राचे केजरीवाल !

लेखक ओंकारा यांनी सोमवार, 10/11/2014 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम.

क्या अच्छे दिन आ गये ?

लेखक hitesh यांनी सोमवार, 10/11/2014 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !

पूर्वेच्या समुद्रात- १

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 10/11/2014 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे.

जॉर्डनची भटकंती : ०८ : मृत समुद्र आणि परतीची कथा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 09/11/2014 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६...

आल्प्सच्या वळणांवर - भाग ८ - आरं नदी आणि ग्रिंडेलवाल्ड (अंतिम)

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 09/11/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता.