महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ?
२. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ?
३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ?
५.
मिसळपाव
प्रातःकिरण
वरील विस्तारित शब्दांना विशेष अर्थ नाही. राजगडाची आठवण काढल्यावाचून राहणं कठीण होतंय, म्हणून आपलं काहीतरी. पहिल्या वेळेस राजगड भेट झाली तेंव्हाच पुन्हा यायचं हे निश्चित केलं होतं. त्या 'पुन्हा' चा जो योग आला तो फार वेगळा आणि विशेष होता. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राजगड पदभ्रमण मोहीम आयोजित केली गेली आणि सोबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब असणार अशी माहिती फेसबुकवर बघितली. आप्पांना आधीही भेटलो होतो, त्यांची पुस्तकं वाचलेली आहेतच.