Skip to main content

वायला

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 19/08/2015 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
"किरण्या लका आवल की लौकर" लालजर्द लिपस्टीक ओठावर फिरवायच्या आधी तोंडातली तंबाखू थुंकायला किरण्या उठला. ऊंच टाचेचा तोल सांभाळत चुडीदार सावरुन अन ओढणी ओढून परत गायछाप मळायला लागला. "किरण्या, तुझी सुपारी नाय फोडायला चाललो भाड्या. येतोयास का न्हाय?" "आहाहा आली माझी डार्लिंग. आयायाया काय दिसतीया" म्हणत दिप्याने किरण्याला आवळला. "गपेय तुझ्यायला. आजची हजाराची लेवल कर अन पाश्शे त्या राणीवर घालीव. हितं काय उपेग नाही. मला नड हाय पाचशाची तेवढे गावले की बास्स" दिप्याने झाडीत लावलेली यामा काढली.

पदार्पण (सिक्वल कथा)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 19/08/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक हॉस्पिटल, बाहेर वर्दळ पण वॉर्डमधे गूढ भयाण शांतता, बाहेर नर्सची लगबग, औषधांचा कडूजहर वास, सातव्या मजल्यावरच्या स्पेशल वॉर्डमधे तो सलग वर्षभर बेडवर खिळून होता… सुरुवातीला काही विसीटर्स यायचे, फुलं बुके वैगरे उशाजवळ ठेवून जायचे, पण एक दोन महिन्यांतच ते थंडावलं. त्या रात्रीसुद्धा त्याच्या जवळचा मॉनिटर बीप बीप असं कोकलू लागलेलं, त्याच्या शरीरात कुठेतरी काहीतरी उलथापालथ होत असावी, आवाजामुळे दोन नर्स धावत आल्या. एक ड्युटीवरची सिनिअर व दुसरी नुकतीच दोन आठवड्यापूर्वी रुजू झालेली नवखी. नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, 'सालभरसे बेचारा कोमामे है '…….

एक गोष्ट त्यांची पण !!!"

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 19/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट त्यांची पण !!!: रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही . पण आज मात्र वेळ पळत नव्हता अन विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते .

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/08/2015 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

द्वेषाची खाई....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 19/08/2015 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या मृत्युनंतर जो खास अंक इंदूप्रकाशने काढला, त्यातील "प्रकाशकाचे दोन शब्द" येथे टाईप करुन टाकतो आहे कारण फोटोमधील अक्षर फार लहान येते व वाचता येत नाही. हे टाकायचे कारण म्हणजे त्यावेळेस सामाजिक व राजकीय वातावरण किती प्रगल्भ व विचारी होते हे समजते. आत्ताच्या जाणत्या राजांबद्दल काय बोलावे ? स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.

हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !

लेखक गोगट्यांचा समीर यांनी मंगळवार, 18/08/2015 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / Tab / Laptop च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते . पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन उचललेल्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली .

फस्ट साईट लव....

लेखक चेतन677 यांनी मंगळवार, 18/08/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्‍यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

पशु-पक्षीभूषण

लेखक तिमा यांनी मंगळवार, 18/08/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत. सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला. कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला.

किडा वळवळला अन …

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 18/08/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
* सत्यघटनेवर आधारित, अत्यंत काल्पनिक कथा. हवेत सकाळच्यावेळीही उकाडा जाणवत होता, गुन्हा-अन्वेशनच्या कचेरीसमोर पोलिस व्हँन उभी होती, नुकतेच बाहेरून आत आलेला इंस्पेक्टर, कचेरीत जमलेल्या सर्वांवरून नजर फिरवत होता, सगळे आपापसात एकमेकांकडे पाहत होते, चालू फ्याशनप्रमाणे त्या पोरसवदा युवकांची, मानेवर रूळणारी व कान झाकणारी अशी, सिनेमातल्या अँन्ग्रीयंगमँन हिरोसारखी हिप्पी केशरचना होती, लांब कॉलर शर्ट अन बेलबॉटम पँट वेश. गावात अफवांचा पूर आला होता. भीतीचे सावट अधिक गडद झालेले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेले.