Skip to main content

फक्त तुझ्यामुळेच

लेखक bond यांनी शनिवार, 21/05/2016 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
जागतो आहे रात्र रात्र आठवणी्च्या दुनियेत न राहिलो मी माझा फक्त तुझ्यामुळेच का नाही कळ्ले तुला काय आहे माझ्या मनी बुड्लो आहे आकंठ पोहणे माहीती असुनी पायातील पैजंणात तुझ्या कैद केलेस तु मला सुटका नाही मज आता टाक सरळ चिरडुन मला होते समजत तुला तर का नाही बोललीस आग लागण्याआधीच राख का नाही चोळ्लीस

किती लौकर आज उजाडलं बाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/05/2016 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
किती लौकर आज उजाडलं बाई कानडाऊ योगेशू यांच्या या रचनेत रोमांचीत कल्पना आहे. सजणप्रेमाने व्याकूळ झालेली विव्हलता रेखाटली आहे. कुणाचे प्रेम रांगडे असते जसे एखादा जव्हेरगंज "जीव नांगरटीला आलाय" म्हणून हक्काने मागून घेतो किंवा एखादा अल्लड प्रेमाने भारून आपल्या प्रियतमेचे प्रियाराधन करण्यास संकोचतो.

सफर ग्रीसची: भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन

लेखक निशाचर यांनी शनिवार, 21/05/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य किंवा मरण! जगाला लोकशाही, पाश्चिमात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान देणा-या ग्रीसला साजेसं हे ब्रीदवाक्य! ग्रीस म्हटलं कि आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस, एजिअन समुद्राचं निळाशार पाणी आणि सान्टोरिनीची निळीपांढरी घरं. ग्रीसला भेट देण्याची आणि विशेषतः तेथील पुरावशेष बघण्याची आम्हा उभयतांची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ग्रीसच्या भटकंतीबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रवासाचे नियोजन
अथेन्स विमानतळावर २१ डिसेंबरला दुपारी आगमन आणि तिथूनच ३० डिसेंबरला संध्याकाळी प्रस्थान ठरले. ग्रीसला प्रथमच जाणा-या इतर अनेक पर्यटकांप्रमाणे आमचाही अथेन्सला अग्रक्रम होता.

मी मारलेल्या एकूण माश्या

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 20/05/2016 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी मारलेल्या एकूण माश्या सत्तावीस मोजण्यात खूप वेळ जातो खिडकीचा एक ग्रील तुटला आहे त्याच्या जरासं खाली एक झुरळ फिरते आहे बघण्यात खूप वेळ जातो कंटाळा आल्यावर मी एखादी कविता लिहायला घेतो शब्द? शोधण्यात खूप वेळ जातो आरसा फुटलाय माझ्याकडचा रोज उठून कोण बघणार त्यात? साला, जगण्यात खूप वेळ जातो आयुष्य ! ही तर एक शिक्षाच आहे भोगण्यात खरंच खूप वेळ जातो -जव्हेरगंज

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

अधांतर -2

लेखक समीर१२३४५६ यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
- परंतू नियतीच्‍या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता अलकाचे लग्‍न जुळत नव्‍हते, तिच्‍या वडिलांनी ब-याच ठिकाणी बोलणी करुन पाहिली होती, परंतू सगळीकडे नकारघंटाच ऐकू येत होती. अलकाचे दिसणे वागणे खूपच चांगले होते, परंतू का कोणास ठाऊक सर्व लोक कृष्‍णाला खूृृप घाबरत असायचे. कृष्‍णााला मात्र या गोष्‍टीचा थांगपत्‍ता नव्‍हता, तो आपल्‍या बहिणीसाठी वणवण फिरत असायचा.

एवढीशी गोष्ट

लेखक abhajoshi14 यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने.

मी अनुभवलेले एव्हरेस्ट ...

लेखक हृषिकेश पांडकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेला असलेले महत्वाचे राज्य आहे.महाराष्ट्र आणि कोकण यांच्या मध्ये संपूर्ण सह्याद्रीची रांग पसरलेली आहे.महाराष्ट्रात कळसुबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ५४०० फुट इतकी आहे.महाराष्ट्राला ७०० कि.मी चा समुद्र किनारा लाभला आहे. पांडकर ...धडा वाचणे चालू असताना आपले लक्ष कुठे आहे...न वाचता सांग बरं...

..किती लौकरच आज उजाडलं बाई..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 20/05/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
..किती लौकरच आज उजाडलं बाई.. सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही किती लौकरच आज उजाडलं बाई... सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ.. झोपमोड त्याची मला करवत नाही.. चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र.. अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र.. वाटे सकाळच कधी उगवणार नाही..! तसा आहे आज छान रविवार सुस्त.. घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त... लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई.. सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही... किती लौकरच आज उजाडलं बाई + कानडाऊ योगेशु

गाव दत्तक देणे आहे !!

लेखक नितिन शेंडगे यांनी शुक्रवार, 20/05/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुन्या काळा पासून दत्तक घेणे हा प्रकार आहे. राजे, सरदार किंवा अन्य तत्सम मंडळी ज्यांना मुलबाळ नाही किंवा मुलगा नाही(वंश किंवा गादी पुढे चालवन्यासाठी) ऎसे लोक दत्तक पुत्र घेत. त्याचा सांभाळ करत. पुढे जावून हेच दत्तकपुत्र मालक किंवा राजा होत... सध्याच्या युगात मात्र एक नविन फैशन आली आहे ती म्हणजे गाव दत्तक घेण्याची, आणि ती हिंदी चित्रपट सृष्टीत जरा जास्तच आहे.. एखादा चित्रपट येणार असेल तर त्याला नजरेसमोर ठेवून गाव दत्तक घेतले, श्रमदान केले ऎसे इवेंट केले जातात आणि मीडिया ही त्याला भरपूर प्रसिद्धि देतो. चला चांगले आहे, की लोक अजूनही समाजकार्य करत आहेत.