आली गौराई अंगणी
नमस्कार मंडळी,
या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी.
तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून.
मिसळपाव
.
.
कृती:
बेसन, कणीक, तांदूळ पिठी चाळून एकत्र मिसळावी.
त्यात १ टेबलस्पून तूप तापवून मोहन घालावं. मोहन मिश्रणाला सगळीकडे एकसारखं लागलं की त्यात आधी नारळाचं घट्ट दूध मिसळावं, आणि नंतर मग पातळ दूध मिसळून भज्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट भिजवावं.