संघर्ष : भाग ०३
भाग ०२ पासून पुढे.
अनिकेतने सागर आणि प्रितीला घरी सोडून गाडी राधाच्या घराकडे वळवली अनिकेत काहीच बोलत नव्हता तशी राधाही मौन होती. गाडी घराबाहेर पार्क करून अनिकेत राधाला आत घेऊन गेला राधा खूप दमली होती त्याने तिला सोफ्यावर बसवून कॉफी प्यायला दिली. दिवस मावळत आला होता राधाला असं एकटं सोडून जाणं अनिकेतला योग्य वाटत नव्हतं त्याने परत प्रितीला फोन लावून स्थितीचा अंदाज देत राधाच्या घरी येण्यास सांगितलं. प्रितीने होकार दिला
अर्ध्या तासात प्रिती तेथे पोहोचली.
ग्राम"पंचायत" लागली..!! -1
गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता घरी जायला हडपसरच्या बस स्टॉप वरून पंढरपूरला निघालेला लाल डब्बा पकडला. दार उघडून बघतोय तर गाडी खचाखच भरलेली.
"आयला एकादशी वगैरे नसताना पण पंढरपूरला लोक रोज का जात असतील?." मनात पहिला विचार आला. सासवड- जेजुरी पर्यंत उभं राहून जावे लागणार हे पक्क होतं. खांद्यावरचं धोपटं काढून वरच्या जाळीत टाकणार तेवढ्यात 'सोन्या' ने हाक मारली. "पाव्हणे या मागे. तिघं बसू ". बाबू मांढरेला पलीकडे ढकलून सोनावणे म्हणाले. बाबू आणि सोन्या माझ्या शेजारच्या गावची, डेली अप डाऊन करणारे.! सोन्या अप डाउन मधला सगळ्यात सिनियर बडबड्या खेळाडू मेंबर म्हणा.
बाबा-बुवांचे सामाजिक काम
- डॉ. सुधीर रा. देवरे
भारतात बाबा-बुवांचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. अलिकडे खाजगीत एक चावळ सुरू झालीय की म्हणे हिंदु धर्माच्या बुवांनाच टारगेट केलं जातं. म्हणून इथं एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल की हे बुवा सगळ्याच धर्मात आहेत आणि आपली स्वार्थिक बजबजपुरी त्यांनी आपापल्या धर्मात प्रचारून आपली दुकाने यथास्थित सुरू ठेवलीत.
तंत्रधागे मिपावरचे!
आज १५ सप्टेंबर "अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"
आजच्या दिवसाचं निमित्त साधून मिपावरच्या वाचनीय अशा विज्ञान व तंत्रधाग्यांचे दुवे असणारा एकच धागा बनवला आहे.मिपावरंच थोडी शोधाशोध करुन मग हे धागे इथे पेस्टवले आहेत.
जे धागे मालिका स्वरुपात आहेत त्यांच्या शेवटच्या भागाचा दुवा दिला आहे.म्हणजे त्या धाग्यावर गेल्यास आधीच्या भागांचे दुवे मिळतील.
प्रतिसादांच्या माध्यमातून विभागणी केली आहे.सध्या एवढे धागे दिले आहेत.नंतर यात भर घातली जाईल.मिपाकरांनीही इथे न आलेले वाचनीय तंत्रधागे दुवारुपात उपप्रतिसादाच्या माध्यमातून धाग्याच्या नावासह देऊन भर घालावी तसेच जे कोणी यापुढे नवीन तंत्रधागा
सूर्याच्या उष्णतेने तापलेली धरणी वारुणराजाला विनवणी करते
हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा
तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा
उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे
निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे
शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे
एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे
वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला
परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला?
तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू?
हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू?
करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप
वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप
---- शब्दांकित
वैभव दातार
पावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )
एखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे "कोराईगड". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय.
पाऊस, भूमी आणि मैथिली
पाऊस, भूमी आणि मैथिली
विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या. ----------------------------------------------------------------------------------------------------------- कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*.. पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय...सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे
"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",
..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार
मागच्या वर्षी २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बरेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे.
फासले ऐसे भी होंगे...
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ...
मिसळपाव