<<<<<<<<<<<<<<दोन थोर धर्मांनी - ख्रिश्चन आणि बौद्ध - आपल्या अनुयायांद्वारे बंधुभाव संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुत्वाचा पुरस्कार करून माणसामाणसातील दरी संपवण्याचा प्रयत्न या दोन धर्मांनी केला आहे [७]. आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत म्हणून आपण एकाच कुटुंम्बाचे घटक आहोत. पण ज्यांनी हा विचार स्वीकारला नाही त्यांना ते परमेश्वराची लेकरे नाहीत असे मानून, प्राचीन टोळ्यांच्या अपपरभावाच्या मानसिकतेने, वैरी बनवले गेले. यात मूळ भावनेला (आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत) तडा गेला.>>>>>>>>>>>>>>>
बरे झाले आपण सान्गितले.... आता हेल मेरी कि.न्वा बुद्धं सरणं गछामि हे जगातले श्रेष्ठ मन्त्र आहेत,इतर सर्व म्हणजे कचरा... हेही पुढच्या लेखात लिवा...
<<<<<<<<<<<<<<पण माणसे मात्र इतर माणसांच्या प्रेरणा आपल्या नियंत्रणाखाली
आणायच्या उद्योगात गुंतलेली असतात.>>>>>>>>>>>>>
हे विधान आहे की आपला कबुली जबाब ?
,,,,,,,,,,,,,,,,,,वैज्ञानिक तंत्राची विनाशकारी रूपे ज्या वेगाने विकास पावली त्या वेगाने रचनात्मक रुपांचा विकास झाला नाही. एका घटकेत आज ५००००० माणसे मारता येतात. पण मनुष्य जन्माला यायला लागणारा लागणारा वेळ अजून कमी करता आलेला नाही.>>>>>>>>>>>>>
विज्ञान काय कि.म्वा धर्म काय.... रचनात्मक विकास हाच तर यान्चा पाया असतो... काही महामुर्ख लोक या.म्चा वापर विनाशासाठी करतात....
<<<<<<<<<<<ब्राह्मणांमध्ये वाढणारा एकोपा हा ब्राह्मणद्वेषातून वाढत आहे. त्यामुळे तो
प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा आहे. शंकराचार्यांनी केलेली वैदिक धर्माची
प्रतिस्थापना अशीच प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती.>>>>>>>>>>>
आणि पवित्र धर्म ग्रन्थ लिहिणारे २ धर्म हे देखील प्रतिक्रिया म्हणूनच अवतरले ( !) आहेत, हे मात्र आपण सोयीस्कर रीत्या विसरला ! 'प्रतिस्थापना' हा शब्दच सा.न्गतो की या आधीदेखील हा धर्म आस्तित्वात होता.... मग त्याच्यावरची धूळ झटकली तर ती 'प्रतिक्रिया' कशी ? उलट पवित्र ग्रन्थ लिहिणारे धर्म हे मुळात आस्तित्वातच नव्हते... त्यामुळे त्यान्ची निर्मिती ही मात्र प्रतिक्रियात्मकच आहे..
गलथानपणा धर्मात बोकाळला तेव्हा धूळ का झटकली गेली नाही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तेन्व्हाच तर धूळ झटकली की ! आणि कधी ? धर्माचे अनुयायी धर्माचे नीट पालन करत नसतील, तर तो काय धर्माचा दोष ठरतो का ? :)
<<<<<<<<<<पण ज्यांनी हा विचार स्वीकारला नाही त्यांना ते परमेश्वराची लेकरे नाहीत असे मानून, प्राचीन टोळ्यांच्या अपपरभावाच्या मानसिकतेने, वैरी बनवले गेले. यात मूळ भावनेला (आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत) तडा गेला.>>>>>>>>>>>>>
आफ्रिकन काळे लोक कुणाच्या घरी धुणी भान्डी करत होते ? हिन्दुन्च्या की जैन बौद्धांच्या ? तेंव्हा ते पवित्र करार आणि पवित्र ग्रन्थ वाचणारे काय करत होते ? केवळ आफ्रिकन नव्हे तर रेड इन्डियन, औस्त्रॅलियन आणि आशियाई- भारतीय सुद्धा.... या सर्व प्रभूच्या लेकराना (!) त्रास देणारे कोण होते ? :)
वा .. चांगल्या लेखाचा चांगला अनुवाद. अभिनंदन.
असे अजून लेख वाचायला आवडतील.
मध्यंतरी नंदनने चालू केलेल्या हे 'सारे कोठून येते?' या लेखाची आणि त्यामध्ये झालेल्या चर्चेची आठवण झाली.
शिस्तबद्ध, संकेत-औपचारिकतेने भारलेल्या समाजात, टिव्हीवरती बाहेरख्यालीपणा, येताजाता सूड उगवणारी पात्रे, प्रत्येक लहान भागात एकतरी जोरात मारलेली थोबाडीत पाहून, लोकांच्या या आदीम ऊर्मी शमत असतील की काय असे वाटत आहे. त्याचमुळे या अश्या मालिकांना इतका मोठा दर्शकवर्ग मिळत असावा. (आदीम प्रेरणांचा विजय असो.!!)
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
प्रतिक्रिया
<<<<<<<<<<<<<<दोन
हे
निर्वाणाल
<<<<<<<<<<<ब्राह्
धूळ
भाषांतराब
हा निबंध
गलथानपणा
<<<<<<<<<<पण
हा प्रश्न
मला उत्तर
वा ..