माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
का? आणि मग - स्केटिंग करणे, घोड्यावर बसणे, कडा चढून जाणे - का नको? छे, काहीतरीच!!
मी तर म्हणेन की आजच्या काळात माणसाला खालील तीन गोष्टी आल्याच पाहिजेतः
(कॉम्प्युटरवर) टायपिंग करणे, ड्रायव्हिंग करणे, आणि कमीतकमी स्वतःच्या पैशांचा जमाखर्च मांडता येणे!
आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका.
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रात चहा घेउनच जा, जेवूनच जा असेच म्हणतात....
आणि ते पाळतातही...
पिवळा डांबिस
मी हे वाकप्रचार फक्त पुण्यातच ऐकले आहेत
डांबीसा,हे बाकी बरोबर बोललास.आमच्या पुण्यात अगदी लग्नाची पत्रीका द्यायला गेले तरी 'लग्नाला आल्यावर जेवणार का?' म्हणून विचारतात.मात्र ही सदाशिव पेठी संस्कृती.आमच्याकडे नाही हो!
हवे तेव्हा घरी या,जेवल्याशिवाय सोडणार नाही.
आपलाच,
-इनोबा
माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
मला असं वाटतं की ज्या काळात ह्या गोष्टी लिहिल्या आहेत तो काळ, आणि भारताचा संदर्भ ह्या प्रमाणे तीनही मूलभूत गोष्टी योग्य वाटतात. किंबहुना मी ही ह्याच तीनही वाचलेल्या आठवतात.
शिवाय आजच्या काळाला अनुसरून आपण म्हणता त्या तीनही वाढवायला हरकत नाही.
आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका.
आता ह्याबाबत काय बोलावे? फक्त पुणे असे नाही तर इतरही ठिकाणी असं विचारणारी तर्हेवाईक माणसे मी पाहिली आहेत.
चतुरंग
कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्या बाईला म्हणतात.
अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी!
भारीच.
इतरही चा॑गले. हे भाऊ म्हणजे एकदम भारी व्यक्तिमत्व दिसत॑य.
-ध मा ल.
आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावर
काय पिंकीआज्जी म्हणणार का?
-- हे मात्र पटले. भाऊंना दंडवत.
बाकी सर्व वचने देखील उदबोधक आहेत
प्रतिक्रिया
सृष्टीलावण्यवतीस,
हे बाकी बरोबर बोललास
डांबिसकाका,
मला मात्र
सदाशिव पेठेतली दुकान॑ आठवली...
मस्त