Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निगेटिव्ह थिंकिंग - प्रचंड मोठा अडथळा, उपाय ?

य
यशोदेचा घनश्याम यांनी
Wed, 01/30/2008 - 19:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15941 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Wed, 01/30/2008 - 22:30 नवीन

दिलगिरी

दिलगिरी कशाला व्यक्त करता? मिसळपाव वर वैयक्तिक कोणालाही न दुखवता आपले मत मांडण्याचा अधिकार आहे बहुतेक! राहिला "विषयाचा" प्रश्न ,तो तर खरच छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Wed, 01/30/2008 - 22:45 नवीन

दिलगिरी नकोच

घनश्याम साहेब, येथे उगीचच नाही त्या गोष्टींबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहात. याला मी निगेटीव्ह थिंकिंग म्हणू इच्छितो. राहता राहिला प्रश्न त्यावरील उपायांचा. मी तरी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्याने खरंच खूप फरक पडतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/30/2008 - 22:52 नवीन

डॉ. स्टिव्हन कवी (Dr.Stephen Covey)

यांचं "दि सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" हे पुस्तक वाचले आहे का? ह्यातून फारच चांगले विचार मांडले आहेत. माझ्याकडे हे आहे. जरूर वाचा. समर्थ रामदासांचा "दासबोध"ही फारच सुंदर मार्गदर्शन करतो. हा तर आपलाच आहे त्यामुळे विचार अगदी चटकन पटतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/31/2008 - 13:53 नवीन

दि सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल

नेट वरून डाउनलोड करून ठेवले आहे. अजून वाचले नाहि. 'द मंक हू सोल्ड हिज फेरारी', आणि 'यू कॅन विन' वाचत आहे सध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु Wed, 01/30/2008 - 23:19 नवीन

मला

खूपवेळा असे होते. कधितरी, असे वाटते की, मी एकटिच आहे, मला कोणीही नाही. परदेशात कोणाशी बोलावे कळत नाही. मी गायत्री मंत्र ऐकते. जगजीत्सिंग यांचे 'हे राम' भजन ऐकते, रामरक्षा म्हणते. आवडती गाणी ऐकते. आणि तरिही काही नाहीच झाले तर माझ्या आईला फोन करते भारतात. संत ज्ञानेश्वरांचे "पसायदान" खूप आवडते मला. काहीप्रमाणात मला थोडं मन हल़कं वाटतं. हा विषय इथे सुरू केल्याबद्दल धन्यवाद. - प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 23:50 नवीन

माझे मत..

कुठल्याही समस्येला सर्वतोपरी प्रयत्न करून सोडवायचा प्रयत्न करणे व न सुटल्यास ती गोष्ट सरळ फाट्यावर मारून 'जो होगा, देखा जाएगा' असे म्हणून पुढील परिणामांना सामोरे जायचे ही आपली ष्टाईल! यात निगेटिव्ह विचारसरणीला जागा आहेच कुठे? :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 00:54 नवीन

'जो होगा, देखा जाएगा'

तात्यांची विचारसरणी योग्य आहे. नोकरीच्या सुरवातीच्या काळात, मला त्रास देणारे बरेच भेटले. तसेच मदतगारही भेटले. आपल्याल त्रास देणारे, आपल्याल सदैव जागरुक ठेवतात, आणी कठोर कष्ट करायची प्रेरणा देतात. परंतु कोणी अतिरेकी त्रास देत असेल तर त्याला फाट्यावर मारणे आणी मी तुला फाट्यावर मारतो ह्याची त्याला जाणिव करुन देणे आवश्यक. संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments
य
यशोदेचा घनश्याम गुरुवार, 01/31/2008 - 13:49 नवीन

सहमत

परंतु कोणी अतिरेकी त्रास देत असेल तर त्याला फाट्यावर मारणे आणी मी तुला फाट्यावर मारतो ह्याची त्याला जाणिव करुन देणे आवश्यक. अतिशय योग्य... काहि ठिकाणी जशास तसे वागावेच लागते!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/31/2008 - 15:34 नवीन

मानसिक

त्रासावर नामस्मरण आणी संयम हे दोनच उत्तम उपाय. बाकी एहिक जगतात त्रास देणार्याना फाट्यावरच मारावे.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 15:54 नवीन

जे जे होते..

ते नेहमी भल्या साठी होते. इतके लक्षात ठेवा.. बाकी तात्या म्हणतो तसे 'जो होगा, देखा जाएगा' एखादा छंद असेल तर तो जोपासा .. मिसळपाव आहेच इथे या चर्चा करा.. गप्पा मारा.. विडंबने करा.. आयुष्य खूप सुंदर आहे..आणि ते तुम्ही त्याच्या कडे कसे बघता तसे ते तुम्हाला वाटते/दिसते.. तेव्हा झटकून द्या ते निगेटिव्ह विचार.. लागा कामाला.. (बी +)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 16:01 नवीन

हेच,

आयुष्य खूप सुंदर आहे..आणि ते तुम्ही त्याच्या कडे कसे बघता तसे ते तुम्हाला वाटते/दिसते.. तेव्हा झटकून द्या ते निगेटिव्ह विचार.. हेच म्हणतो! काही गोष्टींनी साध्य काहीच होत नाही, उलट त्रासच होतो फुक्कटचा. नकारात्मक विचारसरणी ही त्यापैकीच एक! तेव्हा ती लवकरात लवकर झटकून देणे हेच उचित आहे... आपला, (सकारात्मक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ब
बापु देवकर गुरुवार, 01/31/2008 - 19:52 नवीन

मी या

मी या गोस्टीचा विचार करत नाही...पण अस झालच तर इतरासारखा नामस्मरण करतो,आवडती गाणी ऐकतो,पुस्तक वाचतो....आणी महतत्वाच पुन्हा नवी सुरवात करतो...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 00:16 नवीन

:)

आणी महतत्वाच पुन्हा नवी सुरवात करतो... हे आवडले! :) आणि माझ्यामते तेच खरेही आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापु देवकर
प
प्रमोद देव गुरुवार, 01/31/2008 - 20:13 नवीन

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा....

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोती(सभोवती) आनंद जीवनाचा असे एक गाणे आहे. तसेच अजून एक गाणे.... अंधाराची खंत तू कशाला करशी रे गा प्रकाश-गीत.. ह्या गाण्यांचा अर्थ जाणून घ्या. जीवन म्हटले की आशा-निराशा,सुख-दु:ख वगैरे गोष्टी येणारच. तेव्हा त्या तशा स्वीकारण्याची मनोवृत्ती तयार केली तर मग यशाने माणूस हवेत तरंगत नाही आणि अपयशाने खचून जात नाही. तेव्हा ज्या गोष्टीत आपले मन रमते ते करावे. मग ते नामस्मरण असो,योग असो,वाचन-लेखन,गायन-श्रवण अथवा अजून काही असो. ते जरूर करावे. अशुभस्य कालहरणम! असे म्हटले आहे. तेव्हा हा काल जमेल तसा आणि तितका आनंदात घालवण्यासाठी आपल्याला असलेल्या छंदात व्यतीत करावा. छंद नसल्यास लावून घ्यावा. रडत बसण्याने काहीच साध्य होत नाही. जे क्रमप्राप्त आहे ते धीराने सोसण्याचे बळ अंगी यावे ह्यासाठीचे हे उपाय आहेत. ज्याला जे जमेल त्याने ते करावे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! ह्या न्यायाने सतत काही तरी करत राहा. मग पाहा निराशा तुमच्या सावलीला देखिल उभी राहणार नाही. अर्थात नेहमीच सकारात्मक गोष्टी गृहित धरू नये. त्यामुळे अतिउत्साहात अपयश येऊ शकते आणि माणूस अजून दु:खी होतो. एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबी ध्यानात घेतल्याच पाहिजेत. ह्यालाच सारासार विचार असे म्हणतात. अशा प्रसंगी एखाद्या विश्वासातल्या अनुभवी माणसाचा सल्ला घ्यायलाही हरकत नाही. इतके करूनही अपयश आलेच तर रडत बसू नये.अपयशामागच्या कारणांची मीमांसा करावी. त्यातूनही नवा मार्ग सापडू शकतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 20:20 नवीन

प्रमोदकाका,

अर्थात नेहमीच सकारात्मक गोष्टी गृहित धरू नये. त्यामुळे अतिउत्साहात अपयश येऊ शकते आणि माणूस अजून दु:खी होतो. एखाद्या गोष्टीचा विचार करताना त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाबी ध्यानात घेतल्याच पाहिजेत. ह्यालाच सारासार विचार असे म्हणतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. "सारासार विचार" फार महत्त्वाचा. अतिउत्साहाच्या भरात वरवर आकर्षक वाटणार्‍या आणि भुरळ पाडणार्‍या कित्येक गोष्टी ह्या विचाराअंती तोट्याच्या असल्याचे सिध्द होते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
धोंडोपंत गुरुवार, 01/31/2008 - 20:58 नवीन

ज्योतिष

लोकहो, या ठिकाणी आम्हांला ज्योतिषशास्त्राचा फार उपयोग होतो. जी गोष्ट होणार नाहीये किंवा होणार आहे त्याबद्दल चिंता आणि खेद करण्यात आपण आपली बरीच उर्जा खर्च करीत असतो. अनेकदा नको तो आटापिटाही होत असतो. पण ज्योतिषविषयाची माहिती असेल तर अनेक आडाखे मनाशी बांधता येतात आणि अनेकदा अत्यंत थक्क करणारे अनुभवही येतात. नुकतेच घडलेले उदाहरण सांगतो. शेअरबाजार गेले तीन महिने फार तेजीत होता. निर्देशांक जवळपास रोज नवीन उच्च पातळी गाठत होता. आम्ही जेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थितीची सांगड मार्केटशी घातली तेव्हा मंगळ मार्गी लागण्यापूर्वी एक जबरदस्त तडाखा मार्केटला देईल अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो . आणि आमच्या काही समूहांवर त्याबद्दल लेखनही केले. त्यावेळेस स्वतःला शेअरबाजारातील जाणकार समजणार्‍या अनेक "तज्ज्ञांनी "आम्हांला वेड्यात काढलेही होते. आमच्या मित्रमंडळींनीसुद्धा ..."हे जरा लईईईई होताय" अशा स्वरूपाचे प्रतिसाद आम्हाला ऑफलाईन दिलेले होते. कारण तेव्हा प्रत्येक जण सेंसेक्स २५००० वर पोहोचेल अशी स्वप्ने पहात होता. पण गेल्या १० दिवसात काय घडले आहे हे आम्ही सांगायची गरज नाही. आपला, (भविष्यवेत्ता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/01/2008 - 00:56 नवीन

उत्तम वाटले वाचून

मी देखील नामस्मरण करतो. जेव्हा जेव्हा असे विचार मनाला त्रास देतात. तेव्हा माझ्या आईने सांगितलेली रामदास स्वामींची ओळ मनात स्मरतो. "सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे|". आपल्यामागे आपल्याला सांभाळणारा कोणीतरी आहे ही भावना फार बळ देते जगण्यासाठी. तसेच मी एक गोष्ट कायम मनात धरून आहे की संधी प्रत्येकाला मिळत असते. आज दुसर्‍याचे चांगले झाले पण माझे झाले नाही ठीक आहे कधीतरी माझे पण चांगले दिवस येतील. हींदी मधे म्हणतात ना 'कुत्ते का भी दिन आता है|" सो मेरा भी दिन आयेगा जरूर. त्यामुळे याच दिवसाची वाट बघत जे काही घडत आहे ते स्वीकारत आणि शक्य ते सर्व प्रयत्न करून ते स्वत:ला अनुकूल बनवित असतो. मनाप्रमाणे घडले तर उत्तम नाही घडले तर पुढच्या वेळेला नक्की घडेल असे मनाशी पक्के करतो. (हिम्मतवान) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
य
यशोदेचा घनश्याम Fri, 02/01/2008 - 11:40 नवीन

सुसंवाद

सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे|". आपल्यामागे आपल्याला सांभाळणारा कोणीतरी आहे ही भावना फार बळ देते जगण्यासाठी. - अगदि बरोबर. योग्य वेळि योग्य शब्द वापरून आपल्या भावना - मते इतरांकडे व्यक्त करायला येणे खूप महत्वाचे आहे. आई हिच फक्त अशी असते कि, तिला न बोलताहि मुलांच्या भावना, ईच्छा, अपेक्षा कळतात. पण ईतर ठिकाणी बोलावेच लागते. अगदि ईश्वराकडेहि मनातली ईच्छा बोलून दाखवावी लागते. स्वतःला स्पष्टपणे ईतरांसमोर मांडता आले पाहिजे. त्यामुळे नोकरी, नातेसंबंध दृढ व्हायला मदत होते. नाहितर पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीने वागल्यास नकारात्मक विचारांना खतपाणीच मिळते.
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 02/04/2008 - 19:05 नवीन

आई...कारण ती

आई...कारण ती बाळाशी एकरुप झालेली असते...असेच जेव्न्हा आपण दुसरर्‍याबरोबर होऊ तेव्न्हा नक्कीच कोणी दु:खी होणार नाही.ऊलट आपण त्या परमेश्वराजवळ जाऊ... राजाजी....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा