काही प्रश्ण कळले नाहीत
देशाबाहेरील समस्या: (हा काय प्रकार आहे?)
१. काश्मीर मधे कधीही न संपणारे अतिरेक्यांबरोबरचे युध्द.
८. प्रादेशिक पक्षांची दादागिरी, राजकीय गुन्हेगारीकरण व सामान्य माणसाची असहायता
ह्या गोष्टीला, कोणत्याही पक्शाचे असल तरी, सरकार कस जबाबदार आहे किंवा ते काय करू शकणार आहे?
-----
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)
काश्मीर जरी भारताचा भाग असला तरी त्यांतल्या समस्या या बाहेरील देश निर्माण करत आहेत. शिवाय आपण नकाशात दाखवतो तो सगळा काश्मीरचा भाग आपल्या ताब्यात नाहीच आहे. एक मोठा लचका पाकिस्तानने तोडला आहे आणि त्यातील काही भाग परस्पर चीनला बहाल केला आहे.
प्रादेशिक पक्षांच्या दादागिरीला सरकार जरी जबाबदार नसले तरी घटनेत दुरुस्ती करुन प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या निवडणुका लढवता येणार नाहीत अशी तजवीज करता येईल. असे केले तरच पूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात येऊ शकेल.
जात, धर्म, मी वैयक्तिकरीत्या मानत नाही, तेवढेच मला पुरे आहे. कोणत्याही पंथात जाण्याची इच्छा नाही.
प्रतिक्रिया
काही प्रश्ण
देशाबाहेरील
सहमत!