साध्या गोष्टीचा नासुर करण्याची काय हौस असते काही जणांना
खरंय. मी सुद्धा हे अनुभवलंय.
उदा: आता साधं कुणाला जेवायला घरी बोलावलं असेल. बायको खपून ४ पदार्थ करते. चांगले झालेले असतात. पण नेमके ज्याला जेवायला बोलावले तो काही जास्त खात नाही. आता तो मला सांगतो की बाबा रे सकाळपासून पोट जाम तट्ट फुगलंय, जात नाही आता जास्त. आग्रह करू नकोस. तर तो गेल्यावर कितीतरी वेळ तोच विषय चालू .."नीट नाही जमलेत ना पदार्थ? हट् ब्वॉ.."
कितीही समजावून सांगीतले तरीही ते पटत नाही.. मग २-३ तासांनी जरा शांत होतं वातावरण. पण तोवर स्वतःचा मूड खराब केलेला असतो.. जेवण नीट केलेले नसते.. :)
राघव
विप्र काका ,
सुंदररित्या मांडले आहे.
आजकाल गाडीचा वापर अगदी कमी असतो. मुलाला गाडी फुल टँक ठेवणे आवडत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आठवड्याला एकदा पाच लीटर पेट्रोल भरतो.
आठवड्यातुन एकदा ५ लि. भरण्यापेक्षा , फु्रसतीचा व आरामाचा वेळ मिळाला की थोडे थोडे पेट्रोल भरावे.
शेखर
प्रभूसर, नेहेमीप्रमाणे थोडक्यात पण मुद्याचं! मजा आली.
गम्मत म्हणजे, 'मुलाला काय वाटेल्/वाटले असेल' हे किंवा बायको ने १० फुटावर लांब उभे राहाणे जसे जुनाट विचारसरणीचे आहे, तसे बायकोशी शरीरसंबंध अबाधित चालू ठेवण्याची मानसिकता 'मॉडर्न' ही आहे. नाहीतर मूल होऊन ५ वर्षे 'लोटली' असे म्हणणारे वाटणारे, कुढणारे महाभाग संख्येने जास्त असावेत. वागण्यात असा विपर्यास नेहेमीच होतो असे दिसते. एका परीने कमालीचे परिपक्व, पण काही बाबतीत टोकाचे अपरिपक्व असे वागणारे लोकच बहुतांशी सापडतात.
या कथेतून काय बोध घ्यायचा? किती टिकावू असेल तो? माहीत नाही! समुपदेशन करून एक चूक सुधाराल, पण बाकी नवीन १० चुका निस्तरायला निर्माण झाल्या असतील.
(अद्याप अपरिपक्व) शशिधर
प्रभूकाका,
आवडला लेख. अशा प्रकारची परिस्थिती भारतात जास्त असण्याचे काही विशेष कारण असू शकते काय?
म्हणजे, पश्चिमेकडील देशांत राहणार्या भारतीयांना याचा त्रास नाही होत कारण मुलांना लहानपणापासूनच सगळे डोळ्यासमोर असते.
कदाचित तिकडे श्रीमंतीमुळे १बी.एच्.के. चा प्रश्न येत नसेल.
बाकी मुद्दा काळजी करण्यासारखा आहे. मुलाने जर चार-चौघांसमोर/नातेवाईकांसमोर चुकून काही बोलले तर चांगलाच बभ्रा होउ शकतो ना?
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म
छान लिहिलेत..
प्रभुचं
सुंदर
छान
वाळवंट!
मुद्दा काळजी करण्यासारखा आहे