बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे,
मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे,
बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय?
मजा म्हणजे बंगलादेशाच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत नसेल तर इतके बांगलादेशी धोका पत्करून भारताची सीमा ओलांडून का येतात?
कमीतकमी इथून परत गेलेल्या बांगलादेशी नागरिकांनी तरी त्यांच्या खेळाडूंना सांगावे की बाबांनो भारतात काहीच धोकादायक नाही.
तुम्ही खेळून झाल्यावर दादर पुलाखाली भाजी विकू शकता, एखाद्या दुकानात खाटकाचे काम करू शकता,
स्पर्धेत अपयश मिळाल्यास (आणि ते मिळणारच आहे) लोकभयास्तव स्वदेशी जायला भीती वाटत असेल तर इथेच राहू शकता, त्यासाठी आधार कार्ड काढून देणारे तुम्हाला गल्लोगल्ली भेटतील.
पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवू शकता, राशन वरचे धान्य घेऊ शकता, भारतीय नागरिक कर कशाला भरतात ? बांगलादेशी नागरिकांसाठीच ना? मुळात आपण आणि ते एकच नव्हतो का?
समजा, कोणी तुम्हाला ओळखले तर मग्रुरी दाखवून त्यालाच धमकी द्या, भारतीय बुळे असतात, अतीच झाले तर जवळच्या मशिदीत आसरा घ्या.
ते कशाला? भारतात जाण्यापूर्वी तुम्हाला तिथे चोरून स्थायिक होण्याचा क्रॅश कोर्स आहे,
एखादा सामना हरलात की जवळच्या मशिदीत जाऊन तो क्रॅश कोर्स करून या.
मी तर म्हणतो परत गेलेल्या बंगलादेशींनी तिथे भारतात अवैध मार्गाने स्थायिक कसे व्हावे याचे क्लासेस घ्यावेत.
आपल्याकडे नाही का अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी संस्था असतात, तशा संस्था त्यांनी काढाव्यात.
बरे दरपोक्ती बघा,
काय तर म्हणे बांगलादेश जर सहभागी नाही झाला तर भारत 20 कोटी प्रेक्षकांना मुकेल.
हसावं की रडावं?
अरे 20 कोटी काहीच नाही रे,
उलट विश्वचषकात सामील झाले असतात तर दोन घास पोटात गेले असते, त्यावर पण पाणी सोडलंत? एवढी अवदसा का आठवली?
मस्करी सोडली तर काही मोठ्या संघांना धक्के देण्याची क्षमता आहे त्यांच्यात, सेमी मध्ये पण जातील, कप सुद्धा जिंकतील, काही सांगता येत नाही.
पण तो फ्लूक असेल,
भारताने नाही का 1983 ला कप जिंकला? कोणाला हरवून? विंडीज ला.
आणि मग विंडीज ने भारतात येऊन पाच कसोट्यात आणि पाच वनडे सामन्यात जे काही भारताला धुतलं त्याला तोड नाही,
पण बुंद से गई वो हौद से नहि आती ना?
तो गेलाबाजार पाकिस्तान बघा, तुमचा मोठा भाऊ! की बाप?
असो, जे काही असेल ते, तर तो बघा कसा शहाण्या मुलासारखा जिथे सामने आहेत तिथे खेळायला हो म्हणाला,
पाकिस्तान एखादा सामना जिंकला की त्यांना प्राईज मनी सोबत 11 खेळाडूंच्या घरात राशन भरून द्यावं. भूतदया म्हणून.
बरं भारत ऐकत नाही म्हणून हे icc सोबत बोलतात,
म्हणजे मालक ऐकत नाही म्हणून गुरख्यासोबत बोलण्यासारखे नाही का?
Icc म्हणजे bcci चा गुरखाच झालाय.
गुरख्यावरून आठवलं की जर बांगलादेश येत नसेल तर नेपाळ ला बोलवा, एकतर त्यांना पासपोर्ट ची गरज नाही, त्यांचे एकदोन खेळाडू आधीच भारतात कुठेतरी राखवालदाराची नोकरी करताना आढळले तर नवल वाटायला नको.
गुणी लोक, बिचारे!
मी माझ्या बांगलादेशी सहकाऱ्याला म्हणालो की काय रे तुम्ही चक्क नाही म्हणालात?
तर म्हणाला, होमारा मोर्जी, जब होम कप खिलायेगा तोब तुमको नॉय लैगा,
मनात म्हणालो, हे कधी होणार? 2050 साली?
प्रतिक्रिया
25 Jan 2026 - 9:14 am | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेटसारख्या फालतू खेळात बांगलादेश खेळला काय नाही खेळला काय? ह्याच्याने दोन्ही देशांना, लोकांना काय फरक पडतो? इतका महत्वाचा प्रश्न आहे का हा?
25 Jan 2026 - 9:31 am | खटपट्या
नाही,
अजिबात महत्त्वाचा नाही, ते महत्वाचे नसून सुद्धा एवढा गमजा मारतात म्हणून मजा वाटते
26 Jan 2026 - 10:23 pm | अगोचर
मारुति कांबळेचं काय झालं याच्या इतका हा प्रश्न नक्किच महत्वाचा नाही .. पण जनाधार नक्की आहे क्रिकेट्ला ..
26 Jan 2026 - 10:23 pm | अगोचर
मारुति कांबळेचं काय झालं याच्या इतका हा प्रश्न नक्किच महत्वाचा नाही .. पण जनाधार नक्की आहे क्रिकेट्ला ..
27 Jan 2026 - 12:27 am | खटपट्या
बाहुबलींच्या मते क्रिकेट महत्वाचे नाही.
नसेलही. पण बांगलादेश अजिबातच महत्वाचा नाही.
27 Jan 2026 - 8:27 am | अमरेंद्र बाहुबली
+१
25 Jan 2026 - 11:11 am | धर्मराजमुटके
मित्रा,
तु परदेशी गेल्यापासून तुझ्या लेखनीची प्रसव क्षमता उंचावली आहे याचा आनंद आहे. लिहित रहा. दरवेळेस पोच देता येतेच असे नाही.
बाकी लेखातील वाक्यांशी सहमत असलो तरी बांगलादेशी खेळाडूंना सध्याच्या वातावरणात सुऱक्षित वाटणे शक्य नाही (अर्थात त्यात भारतीयांचा दोष नाही. त्यांच्या देशात जे काही चाललेय त्यानेच त्यांना स्वतःला धोका निर्माण केला आहे.) एखादी संघटना / एखादा राष्ट्रप्रेमी त्यांना इथे आल्यास कानफाडविणे अगदीच अशक्य नाही.
26 Jan 2026 - 9:50 pm | खटपट्या
धन्यवाद मित्रा
25 Jan 2026 - 11:28 am | कपिलमुनी
शीर्षक वाचून बांगलादेश मधील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल, त्यांच्या नरसंहारबद्दल काही लिहिले असेल अशी अपेक्षा होती.
-----
उत्तम लेख. पुलेशू
27 Jan 2026 - 10:50 am | OBAMA80
बांग्लादेशात धर्मांधता येवढी वाढीला लागली आहे की ते स्वतःला परत त्या धर्मांधतेच्या खोल दरीत ढकलून देत आहेत. विकास खुटूंन देश देशोधडीला लागला डोळे उघडतील पण तो पर्यंत वेळ टळून गेली असेल. आज जे स्वतःच्या फायद्यासाठी सपोर्ट करत आहेत त्यांनी किती वाईट परिस्थितीत ढकलले होते हे समजून घेण्यायेवढी तेथील तरूण पिढी वाया गेली असेल असे वाटले नव्हते. हे म्हणजे परत कसायाच्या दावणीला स्वतःला बांधून घेण्यासारखे आहे. अल्ला भला करे उनका