Skip to main content

माध्यमांची आरडाओरड

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 09/05/2025 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले. या एकाच पार्श्वभूमीवर मला सध्या माध्यमांवर चालू असलेली आरडाओरड ’समर्थनीय’ वाटते. मी ७१ चे युद्ध अनुभवले असल्याने (६५ च्या युद्धाच्यावेळेस मी २ वर्षाचा होतो) ते अनुभव जमेस धरून घरातील सर्वांना ट्रेन केले आहे. पण माझ्यासारखे समाजात किती असतील?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3619
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया