✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 05/10/2024 - 20:35  ·  लेख
लेख
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन. कुठच्याच गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ न देणं म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं हा‌ एक मार्ग अंगिकारणं. नक्कीच, जीवनात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात आणि तुम्ही ते निर्णय कसे निवडता आणि तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने ते निर्णय यशस्वी करता आणि यशस्वी होण्यासाठी,कसे योग्य बदल करूं शकता यावर अवलंबून असतं. परंतु, जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या वाटचालीत तुमच्या आशावादकडे आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रभावित होऊ दिला नाही तर येणाऱ्या संधीचे वारे आणि नशिबाच्या लहरी तुम्हाला तिथे घेऊन जातील जिथे तुम्ही आनंदी व्हाल. मला वाटतं की दैनंदिन जीवनातील क्षुल्लक गोष्टींबद्दल काळजी न करणं योग्य असतं. कोणीही आयुष्यात परिपूर्ण नसतो. संपूर्ण जगाच्या अपेक्षा कोणीही पूर्ण करू शकत नाही. कधी तरी आयुष्यात सर्व काही संपलं आहे असं वाटणं, कुणालाही चुकत नाही. जर तुम्ही आयुष्य सहजपणे घेतलं आणि स्वतःला काळजी करण्यापासून दूर ठेवलं, तर शेवटी सगळं काही आपसूप गेल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. जरका आपण काहीतरी बदलण्यास असहाय्य आहात? मग काळजी कशाला?! "काळजी करू नका, आनंदी रहा." असं कुणी तरी अनुभवी आणि विख्यात व्यक्तीने म्हटलंय. ताणतणाव हे अनेक माणसांचे पतन होण्यासाठी उद्भवतात. चांगलं किंवा वाईट होवो पण काळजी मुक्त रहावं. आयुष्यात मोठी झेप घेणं, कुणाला सुटलेलं नाही. फिनीक्स पक्षासारखा मी राखेतून उठून परत उंच भरारी घेईन.असं म्हणत रहाणं मन उत्तेजीत करतं.” प्रो. देसाई हे सर्व आपल्या अनुभवातून सांगत ंहोते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1164 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

तुमचे लेख आले नाहीत तर जे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 21:55 नवीन
तुमचे लेख आले नाहीत तर जे मिपाकराना वाटतं त्याला आनंद म्हणतात.
  • Log in or register to post comments

That is that ---तेच ते

श्रीकृष्ण सामंत
Sat, 05/11/2024 - 12:10 नवीन
मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:)

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/11/2024 - 15:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा