ब्रह्मानंदी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी.
रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी.
तेवढ्यात रूबाबदार लष्करी गणवेशातला एक हरकारा त्यांच्या चौसोपी वाड्याकडे येताना पाहून आजूबाजूच्या वाड्यात खळबळ माजली. सगळे अंदाज घेत होते कुणाकडे हा राक्षस आला आसावा. इकडे तीकडे लक्ष न देता सरकारी माणूस थेट रंगो भटांच्या वाड्याचा दिंडी दरवाजा ओलांडत आत शिरला. बाकीच्या वाड्यातून सुटकेचे निश्वास बाहेर पडले.
दिंडी दरवाज्याच्या बिजागर्या उगीचच कुरकुरल्या.
रंगोभट, ओ रंगोभटानू
सरकारी मुलाजीमाच्या कडक सलामीच्या आवाजाने रंगोभट खडबडून जागे झाले.
साठ पावसाळे पाहिलेला,मुरलेला,खट, चित्पावन,त्याच्या चेहर्यावरची एक ही रेश हालली नव्हती.उगाचच शेंडी कुरवाळत प्रश्नार्थक नजरेने सरकारी मुलाजीमा कडे बघीतले. त्याने साहेबाचा निरोप रंगोभटाला दिला.
सरकारी मुलाजीम - भटानू साहेबान तुका शिबिराक आपयलो.
रंगो-ते कित्याक?
स मु- म्हाका कितें खबर आसां?
रंगो- तूं जा मी येतां.
खुंटीवरची पगडी,काठी,ऐनक सांभाळत मोठ्ठे पोथ्यांचे बाड पडशीत टाकल्या. दोन चिमट्या नसवार ओढली.
मुदपाकखान्या कडे नजर फिरवत रंगोभट म्हणाले,
"साहेबानं शिबिराक आपयलो, तां येता".
आतून काळजीचा सुर आला,
"पयलींच येतां",
"तू कित्याक चिंता करतां", इती रंगो भट.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बरेच वेळाने दिग्दर्शकाने वर पाहीले.
नटसम्राटांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
दिग्दर्शक कप्पाळावर हात मारत म्हणाला " गयी भैंस पानीमे".
‐--------------------------------------------------------
पेर्णा @ चिमी यांच्या धाग्यावरून
https://www.misalpav.com/node/50504/backlinks
प्रतिक्रिया
मस्त एकदम
आधी वाचून काय कल्ला नाय!
धन्यवाद