कोकण सफ़र भाग १ - दिवेआगर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे
बरेच महीने कोकणची वारी झाली न्हवती, २८,२९,३० एप्रिल अणि १ मे अशी सलग ४ दिवस लागुन सुट्टी आल्याने पुन्हा कोकणचा बेत आखला.
त्याबद्दलचा हा थोडक्यात वृतांत.
सोबतच्या ४ मित्रांना घेउन २८ एप्रिलला सकाळी बरोबर ७.३० वाजता एक्सप्रेस हायवेला लागलो, सलग सुट्ट्या असल्याने ट्राफिक जाम होण्याचा धोका होताच, खालापुर टोल नाक्याला ट्राफिकमुळ पाऊण तास गेला. तिथून पालीमार्गे ९.३० वाजता वाकणला पोहोचलो, १० वाजेपर्यंत नाश्ता आवरला अणि माणगावमार्गे न जाता रोह्यामार्गे जाण्याचे ठरवले. रस्ता खुपच ख़राब होता परंतु ट्राफिकची कटकट न्हवती. दुपारी १२.३० वाजता आगरदांडाला पोहोचलो. आता होडीत गाड़ी घालून पलिकडे दिघीला उतरायचे होते.
आगरदांडा
आगरदांडा सोडल्यावर
दिघीकडून दिवेआगर कड़े जाताना
साधारण २ वाजता इच्छित स्थळी पोहोचलो, ८०० रुपये प्रत्येकी ( २ वेळा मांसाहारी जेवण, सकाळी नाश्ता , २ वेळा चहा, पाण्याच्या बाटल्या, राहण्याची सोय, ) घेउन राहण्याची जी सोय होती ती फारच छान होती. ५- ६ खोल्या असलेल दुमजली घर , अंगणात छोटा झोका , मागे बाग, बागेत नारळ, सुपारी, फणस,आंब्याची झाडे, शेणाने सारवलेली जमीन अणि बागेत मस्तपैकी बसायची सोय. घरात टीवी फ्रिज, अश्या सुविधाही होत्या. अणि संपूर्ण घरात फक्त आम्ही ५ जण
केळीच्या पानावर जेवण वाढले होते, जेवणाचा मेनू- तांद्लाची भाकरी, बांगडा, चिकन , आमसूल ( आधी आम्हाला ते वरण वाटले होते ), भात,सोलकढी.
आयुष्यात पहिल्यांदाच बांगडा खाल्ला. खुप सुंदर. स्वस्त असतो त्यामुळ त्याला चव नसावी असा माझा समज होता , अणि खुप काटे असतात म्हणून आईनेही कधी घरी बनवला न्हवता.
जेवल्यानंतर थोडा आराम करुन ५ वाजता बीचवर निघालो.
आनंदाच्या भरात उड्या मारताना लेखक
असाच एक फसलेला प्रयत्न करताना कोंस्टेबल वाघमारे.
एका निवांत क्षणी इंस्पेक्टर महेश
शांत समुद्र किनारा
संध्याकाळी अंघोळ वेगैरे करुन बसलो.
५ मित्र, समुद्र किनारा, थंडगार बियर, जोडीला खारे शेंगा, चकली, सुरमई,मोबाईलला रेंज नाही, मस्त जेवण, रहायला ६ खोल्यांचे घर, सुख सुख म्हणतात ते आणखी का्य असते?
क्रमशः
आगरदांडा
आगरदांडा सोडल्यावर
दिघीकडून दिवेआगर कड़े जाताना
साधारण २ वाजता इच्छित स्थळी पोहोचलो, ८०० रुपये प्रत्येकी ( २ वेळा मांसाहारी जेवण, सकाळी नाश्ता , २ वेळा चहा, पाण्याच्या बाटल्या, राहण्याची सोय, ) घेउन राहण्याची जी सोय होती ती फारच छान होती. ५- ६ खोल्या असलेल दुमजली घर , अंगणात छोटा झोका , मागे बाग, बागेत नारळ, सुपारी, फणस,आंब्याची झाडे, शेणाने सारवलेली जमीन अणि बागेत मस्तपैकी बसायची सोय. घरात टीवी फ्रिज, अश्या सुविधाही होत्या. अणि संपूर्ण घरात फक्त आम्ही ५ जण
केळीच्या पानावर जेवण वाढले होते, जेवणाचा मेनू- तांद्लाची भाकरी, बांगडा, चिकन , आमसूल ( आधी आम्हाला ते वरण वाटले होते ), भात,सोलकढी.
आयुष्यात पहिल्यांदाच बांगडा खाल्ला. खुप सुंदर. स्वस्त असतो त्यामुळ त्याला चव नसावी असा माझा समज होता , अणि खुप काटे असतात म्हणून आईनेही कधी घरी बनवला न्हवता.
जेवल्यानंतर थोडा आराम करुन ५ वाजता बीचवर निघालो.
आनंदाच्या भरात उड्या मारताना लेखक
असाच एक फसलेला प्रयत्न करताना कोंस्टेबल वाघमारे.
एका निवांत क्षणी इंस्पेक्टर महेश
शांत समुद्र किनारा
संध्याकाळी अंघोळ वेगैरे करुन बसलो.
५ मित्र, समुद्र किनारा, थंडगार बियर, जोडीला खारे शेंगा, चकली, सुरमई,मोबाईलला रेंज नाही, मस्त जेवण, रहायला ६ खोल्यांचे घर, सुख सुख म्हणतात ते आणखी का्य असते?
क्रमशः
वाचन
6161
प्रतिक्रिया
0